नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. यावर्षी 29 जून 2023 रोजी आषाढी एकादशी येत आहे. राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.
गेल्या आठशे वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी घेऊन पंढरपूरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैल पायी चालत येतात
हा उपाय केल्याने तुमच्या घरात बरकत राहील, धनधान्याची कमी राहणार नाही. तुळशी म्हणजेच लक्ष्मी स्वरूप असते, आपल्या घराबाहेर असलेली तुळशी आपल्या घरातले संकेत दर्शवित असते,
ज्यांच्या घराबाहेर तुळशी नेहमी वाळत असते, सुकून जात असते त्या घरात पैसा टिकत नाही. त्या घरी लक्ष्मीचा वास नसतो, याउलट ज्या घरात तुळशी बहरलेली असते, तिथे पैसा बरकत सुख-समृद्धी लक्ष्मीचा वास सगळं काही असतं.
म्हणून तुळशीचे महत्त्व खूप जास्त आहे आणि हा सुद्धा तुळशीच्या पानांचा एक उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आणि कोणत्याही वेळी करू शकता. सोमवारपासून रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच पानं तुमच्या तुळशीवृंदावन मधून तोडायचे आहे , फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे पानं तोडत असताना, त्या दिवशी एकादशी नाही ते लक्षात घ्या, कारण एकादशीला तुळशीला हात सुद्धा लावायचा नसतो
आणि दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी आणि रात्री तुळशीला हात लावायचा नाही. सहा – साडे सहा किंवा सात वाजेनंतर तुम्ही तुळशीला हात नका लावू, तुम्हाला तुळशीचे पान तोडायचे आहे तर दिवसा तोडा आणि एकादशी नाहीये हे लक्षात घेऊनच तोडा.
तुम्ही एकादशी असेल आणि रात्री तुळशीचे पान तोडायचं नाही हा नियम फक्त लक्षात ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच तुळशीचे पानं घेऊन देऊघरात बसायचं आहे आणि देवासमोर ही पाच तुळशीचे पानं ठेवायचे आहेत.
तुळशीचे पानं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जप करायचा आहे, जप झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर अक्षता हळदी वहा,
तुळशीच्या पानांच पूजन करायचे आहे आणि आपल्याला हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात बरकत राहुदे.
धनधान्याची कमी राहू देऊ नको आणि अन्न पैसा टिकून राहुदेत, सुख-समृद्धी राहुदे, लक्ष्मीचा वास राहू दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर ती पाच तुळशीचे पानं घ्या , लगेचच एक तुळशीच पान तुमच्या तिजोरीत तुम्ही जिथे पैसा- दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे.
दुसरं तुळशीचे पान तुम्ही धान्यांमध्ये ठेवायचे आहे , तुमचे गहू तांदूळ जिथे साठवता तिथे त्यामध्ये एक तुळशीचे पान ठेवा.
देवघरात एक तुळशीचे पान कुठेतरी लपवून ठेवायचे आहे, यानंतर तुम्ही पाण्याच्या टाकीत एक पान टाकून द्यायचं जिथे कुठे टाकी असेल, टेरेस वर किंवा कुठे अन्य ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे
आणि शेवटचा तुळशीचे पान पाकिटात तुम्हाला ठेवायचं आहे . अशा रीतीने हे पाच तुळशीचे पान तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तुळशीचे पान कायमस्वरूपीसाठी ठेवायचं आहेत.
सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर काढायचं नाही, तसंच राहू द्यायच. पाण्याची टाकीत टाकलेला तिथेच राहू द्यायचं,
धान्यामध्ये टाकलेल्या ठिकाणी, देवघरात ठेवलेला ठिकाणी राहू द्यायचं , पाकिटात ठेवलेला पाकिटात राहू द्यायचं , तुळशीचे पान ठेवले नंतर विसरून जायच की तुम्ही ती ठेवलेली आहेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.