3 जुलै, गुरुपौर्णिमा, स्वामींना आयुष्य भरासाठी गुरू करून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हटले जाते. वेद व्यास यांना प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आलेला आहे कारण त्यांनी संपूर्ण मानव जातीला चार वेदांचे ज्ञान दिले आहे.

गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे.

गुरुपौर्णिमा म्हणजे एक महापर्व ज्यावेळी भूतलावर शुभ ऊर्जा मोठया प्रमाणात वास करते, अशावेळी अशी दैवी शक्ती, सकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या हवी असेल तर हा एक छोटा उपाय नक्की करा.

भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

यंदाच्या गुरुपौर्णिमेचे विशेष म्हणजे याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत काळ देखील राहील. आषाढ पौर्णिमेला गुरुंचे देखील पूजन केले जाते. गुरु मंत्र प्राप्त करण्यासाठी देखील हा दिवस फार महत्वाचा ठरतो.

या दिवशी आपण ज्यांना आपला गुरु मानतो त्यांचा आदर करावा आणि त्यांना नमस्कार करावा. कारण त्यांनी दिलेल्या ज्ञानातून आपल्या जिवनातला अंधकार नष्ट झालेला असतो आणि गुरु द्वारे भगवंताची प्राप्ती होते.

गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या भंडारातूनच आपण जिवनातील प्रत्येक मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करतो. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत गुरु शिष्यांची ही परंपरा सुरू आहे.

या दिवशी फक्त गुरुंनाच नव्हे तर घरातील प्रत्येक ज्येष्ठ सदस्य, आई वडील आणि आपल्या जिवनात कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाला गुरुचा दर्जा देत त्यांचे आभार मानावे त्यांना नतमस्तक व्हावे.

याच दिवशी घरातील हा गुरुपौर्णिमेच्या खास उपाय तुम्ही करावा. स्वामी समर्थ महाराजांची अखंड भक्ती आपण या दिवशी करावी.

सकाळी लवकर उठून शुद्ध स्नान करून देवपूजा, गुरूंच्या प्रतिमेची पूजा करावी. हे प्रतिमापूजन घरीच जमेल तितकं शोभादायी बनवा.

जसे की फुले, हार, अक्षता वहा, तसेच गुरूंच्या प्रतिमेला गंध, फुल, अक्षता वहाव्यात.

गुरुंसमोर आरती लावावी, रांगोळी काढावी, शक्य असल्यास समई लावाव्यात. अजुन एक खास काम म्हणजेच देवघरात सकाळी उठल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत राहील अशा पद्धतीने लावावा.

तुम्ही हा दिवा जसा नवरात्री मध्ये अखंड तेवत राहील अशा पद्धतीने लावता अगदी तसाच आता एक दिवसासाठी लावायचा आहे.

त्यामुळे तुम्ही घरातील देवघरात हा दिवा नक्की लावावा. शक्य तितका स्वामींचा मंत्र जप करा. हा दिवस, ही तिथी अतिशय शुभ मानली जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!