3 जुलै 2023, गुरुपौर्णिमा स्वामीकृपेसाठी करा या सेवा, नशीब बदलून जाईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.

प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते.

व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.

त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!

“हे अशा शब्दांंमधून स्वामी समर्थ आपल्या भक्तांताना सांगतात की, त्यानी जर पूर्ण मनोभावे पूजा केल्यास ,त्याना नक्कीच फलप्राप्ती होईल.तसेच भक्तांच्या समस्या स्वामी भक्त न सांगताक ओळखतात,

आणि त्याचे निवारणही करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे.श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.

त्यामुळे आपल्याला हा उपाय किंवा काम रोज स्वामी समर्थच्या पुढे बसून केल्यास ,जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होईल तसेच न बोलता स्वामी आपले सर ऐकतील,

तसेच न मागता सुद्धा स्वामी तुम्हाला सगळं देतील. पण हे काम तुम्हाला पूर्ण मनाच्या अंतभावाने करावे. तसेच दिवसातून कधीही हे काम करू शकता.

या उपायासाठी आपल्याला मोकळ्या वेळ मिळण्यास ,मग ते सकाळी ,दुपारी किंवा संध्याकाळी वेळी आपल्याला फक्त स्वामींच्या समोर जाऊन शांतपणे बसून राहायचे आहे.

स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर जाऊन बसाल्यास ,स्वामीच्या समोर एक दिवा अगरबत्ती आणि फक्त दिवा लावायचे आहे आणि आपण एकदम शांत बसून राहावे.

तेव्हा काहीही हालचाली करू नका,तसेच काहीही बोलू नका ,स्वामींसमोर कोणतीही इच्छा सांगू नये. याशिवाय काहीही मागू नका.

फक्त स्वामींकडे बघत बसावे.तसेच आपल्या सर्व इच्छा किंवा मागण्या आपली मनातून स्वामींना सांगावे.त्यामुळे संभाषण फक्त नजरेतून करावे. आपण जसे रोज थकून, काम करून घरी आल्यावर आईजवळ बसतो किंवा आईच्या कुशीत डोके ठेऊन निवांत बसतो किंवा झोपतो,

तेव्हा आपण काहीच बोलत नाही, शांत पडून जातोकारण आपल्याला तिथे मन शांत होत असते. त्याचप्रमाणे आपण स्वामीच्या पुढे येऊन बसावे. काहीच मागू नये.आपल्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करू नका.

फक्त स्वामींच्या पुढे शांत बसा. फक्त स्वामींकडे बघत राहा आणि आपला सर्व थकवा गेल्यास,आपल्याला ज्या समस्या असतील त्या स्वामींना आपली नजरेतून सांगा.याशिवाय आपल्या मनातल्या मनात स्वामीबरोबर बोला,

त्यामुळे स्वामी आपले सर्व मागणे ऐकतील आणि तुम्हाला काय बोलायचे, काय करायचे ,काय मागायचे हे श्री स्वामी समर्थना सगळे समजेल आणि ते सर्व तुम्हाला स्वामी देतील पण हा उपाय दिवसातून कधीही 5 मिनिटे करायचा आहे.

हा उपाय दिवसभरातून कधीही करू शकता. पण स्वामी पुढे शांत बसल्यास ,आपले मन पूर्ण शांत ठेवायचा प्रयत्न करावे.कारण आपले मन चंचल असल्यास हा उपायाचा परिणाम तितका प्रभावी होणार नाही.

मग काही दिवसात या परिणाम आपल्याला जाणवेल.कारण न मागता स्वामींना आपल्याला सगळं देतील आणि न सांगता स्वामी आपले सर्व इच्छा पूर्ण करतील.

या दिवशी निरंतर स्वामी नाम घ्या. जप तप करा. पूजा करा. हा दिवस अतिशय महत्वाचा असतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *