नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शत्रूपिडा सर्वांना त्रास देते. शत्रुपीडेपासून आपल्याला जर वाचायचे असेल तर तुम्ही अशी काळजी घ्या. आपल्या बद्दल ते वाईट विचार करतात. नेहमी आपल्याला व आपल्या घरातील सदस्यांना त्रास होईल असे काही तरी वागतात.
आपल्या मार्गात काटे पसरवून ठेवतात. आपल्या सुखाला घरात येऊ देत नाही. त्यांच्या पासुन सावध राहणे खूप गरजेचे असते. अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी हा उपाय नक्किच करा.
या उपायांमुळे घरातील सर्व अडचणी दूर होतील. तुमची नजर दोष कमी होण्यास मदत होईल. शत्रूपासून बचाव होईल, घरातील रोग, आजार सर्व काही कमी होईल. मनात ही आणि घरात ही शांती पसरेल.
नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपला शत्रूपिडेचा त्रास दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा. या उपायाने तुमच्या बाधा, दोष नक्की जातील,
शत्रू बरबाद होईल, दयेची भीक मागेल. आपलं छान आयुष्य काही लोकांना बघवत नाही, काही लोक आपल्यावर जळतात
व त्यामुळे आपल्यावर असे लोक करणीबाधा करतात त्यामुळे तुमचं जीवन सुरळीत असूनही बरबाद होते.
अशा वेळी घरातील या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या व हा उपाय करा.
हा उपाय करण्यासाठी शनिवार हा उत्तम दिवस आहे, शनिवारी हा उपाय केल्यास तुम्हाला भरपूर फायदा होईल. तसेच शनिवारी अशा काळ्या शक्ती,
बाधा दूर होण्यासाठी मदत होते. शनिवारी रात्री हा उपाय करावा. रात्री 10 नंतर, हा उपाय करण्याच्या आधी कोणालाही सांगू नका जेणेकरुन तुमचं नुकसान होईल
व त्यामुळे उपायाचा परिणाम दिसून येणार नाही. यासाठी 7 साबूत लवंग लागणार आहेत, त्यामुळे फुलं असलेल्या 7 पूर्ण आकाराच्या लवंग घ्या
व त्या रात्री 10 नंतर घरी कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन डाव्या हातात घ्या, हातात घेऊन तुमच्या शत्रूच नाव कमीतकमी 21 वेळा घ्या,
नाव घेत असताना अशी कृती करा, एक वेळेस नाव घेऊन मूठीतिल लवंगा ज्या आहेत त्यावर जोरात फुंकर मारा, असे कमीतकमी 21 वेळा करा
व त्या लवंगा कुठेतरी झाकून ठेवा जिथे कुणीही जाणार नाही,
यानंतर उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी रविवारी या लवंग घरी, दारात, टेरेस वरती जाळा. असा हा उपाय सलग 3 शनिवारी करा, त्यामुळे तुमचं जीवन सुफळ संपूर्ण, शत्रूमुक्त होऊन जाईल, शत्रू पीडा होणार नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.