नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.
प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते.
व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.
ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.
अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.
ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
यादिवशी वस्त्र, फळ, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.
सकाळी स्नान, पूजा,अभिषेक, गुरूंची म्हणजेच स्वामींची पूजा करा व स्वामींना दूध साखर हा नैवेद्य दाखवा. तसेच तुम्हाला जमेल तो नैवेद्य दाखवा. यानंतर 10 किंवा 10.30 ला तुम्ही जे काही घरी पोळी भाजी वरण भात बनवलं असेल ते दाखवा.
त्यामुळे तुमचा हा दुसरा नैवेद्य स्वामींना अर्पण होईल. गुरुपौर्णिमा हा एक विशेष सण च असतो स्वामी भक्तांसाठी, जणू हा उत्सवच असतो. स्वामींची शक्य तितकी चांगली सेवा तुम्ही करावी.
तिसरा नैवेद्य आहे सायंकाळी जेव्हा तुम्ही पूजा करता, दिवा लावून स्तोत्र पठण करता त्यावेळी स्वामींची पूजा पुन्हा करा
व स्वामींना पुन्हा तुम्ही जे काही गोड विशेष पदार्थ साधा शिरा किंवा खीर असेल तरी चालते असा नैवेद्य तुम्ही दाखवा.
स्वामींची सेवा करणे व स्वामींचे आवडते पदार्थ आपण अर्पण करावेत. त्यावेळी घरातील वातावरण प्रसन्न राहते. सकारात्मक लहरी पसरतात, वातावरण आनंदी राहते. स्वामींची कृपा राहते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.