नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात.
भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात.
आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपास करावयाचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती असल्यास पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे, असा विधी आहे .
या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपली देवपूजा करावी. तसेच भगवान श्रीहरी विष्णुची कोणत्याही रुपाची पूजा करावी.
तसेच ते शक्य नसल्यास बाळकृष्ण किंवा भगवान श्रीकृष्ण तसेच तिरुपती बालाजी याशिवाय अगदी प्रभू श्रीरामांचे किंवा भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या कोणत्याही एका रूपाची पूजा या दिवशी केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होते.
ही पूजा करत असताना सर्वात आधी एका ताम्हणात विठ्ठलाची किंवा कोणत्याही रूपाची मूर्ती घेऊन, त्या मूर्तीला शुद्ध जल अभिषेक करावा. याशिवाय पंचामृत किंवा दुधाने आपण अभिषेक घालू शकतो.
तसेच अभिषेक घालताना, त्यामध्ये तुळशीची दोन-तीन पाने आपण टाकावीत. तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीच तोडू नयेत. त्यामुळे माता तुळशीची पाने एक दिवस आधीच ही तोडून ठेवावीत
आणि जर तेही करणे शक्य नसेल किंवा नसतील पण त्या तुळशीच्या झाडाखाली सुकलेली पान पडली असतील, तरी सुद्धा ती पाने चालतात, मात्र एकादशी तिथिला चुकूनही तुळशीची पानं तोडू नका.
त्यानंतर आपण अभिषेक करत असताना विष्णवे नमः तसेच ओम नमो नारायणा, ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा. याशिवाय चंदन अर्पण करून ,
हळदी कुंकू लावावं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोन तुळशीची पानं पालते घालून ,श्रीहरी विष्णूना नैवेद्य दाखवावा. कारण भगवान श्रीहरी विष्णूचा तुळशी विवाह तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही.
त्यामुळेच तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. या पूजेमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. तसेच हरिपाठ केला तरीही चालेल किंवा भगवान विष्णूच्या विष्णुसहस्त्रनामाचं वाचन करावे.
त्यामुळेच आपली सर्व इच्छा , मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतील. एकादशीच्या व्रतासोबत भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे, दिवसभर वाईट काही बोलू नये, तसेच घरातील सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घ्यावे.
अभंग, विठ्ठल भजन करावे. विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला अभिषेक करावा. तसेच मनापासून देवाकडे आपली परिस्थिती चांगली राहण्यासाठी शुभ प्रार्थना करावी.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.