नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत. स्वामी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करूया. आपल्या स्वामी महाराज यांनी सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवून आपण दिवसाचे प्रसन्न सुरूवात करूया. मग स्वामी आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही.
स्वामींनी आपल्याला या चार गोष्टी सांगितले आहेत. विचारांचे अलंकार घालने केव्हाही चांगले ते चोरीला गेले तरी जगणे सुटत नाही. त्याचे भले आणि बुरे काहीच वाटत नाही.
ही अनमोल 4 रत्न आपण स्वताकडे बाळगूया. पहिले रत्न आहे माफी, तुमच्याबद्दल कोणी कितीही बोलू द्या ते मनावर घेऊ नका
आणि तसा प्रतिवादही करू नका. त्यांच्या बद्दल मनात रागाची भावना येऊ देऊ नका. उलट त्यांना माफ करा. आपण केलेले उपकार लक्षात ठेऊ नका.
केलेल्या उपकार याचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असते. तिसरे रत्न म्हणजे विश्वास आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र. चौथ्या नंबरचे रत्न म्हणजे वैराग्य.
नेहमी लक्षात ठेवा आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील आपण घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमान काळ जगा.
इथल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या पण त्यात अडकून राहू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका.
तसेच सकाळची वेळ ही अगदी प्रसन्न व उत्साह भरणारी असते, तसेच घरातील या गोष्टी सकाळी उठल्यावर केल्याने घर नेहमीच प्रसन्न राहते व घरात सकारात्मक ऊर्जा भरते.
घराचे मुख्य दार हे नेहमी इतर दारांपेक्षा मोठे व स्वछ असावे. मुख्य दारापुढे कधीही केरकचरा पसारा असू नये. कारण येथूनच देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते.
घरातील पाहिलेले सकाळी उठल्या नंतर स्नान झाले की लगेचच एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी उंबरट्यावर थोडे थोडे शिंपडावे. जर यात गंगेचे पाणी असेल तर फारच चांगले पण गंगेचे पाणी नसेल तर घरातील शुद्ध पाणी टाकावे.
परंतु रात्री झोपण्यापूर्वीच एक तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवावे व सकाळी हे पाणी उंबरट्यावर शिंपडावे यामुळे रात्रभर जमलेली उबरट्यावरील नकारात्मकता दार उघडल्यावर लगेचच सरळ घरात प्रवेश न करता तिथल्या तिथे नष्ट होईल
व आपले घर नकारात्मक उर्जे पासून दूर राहील. तसेच आपल्यावर जर कोणी काळीजादू करणी केली असेल तर शनिवारी व रविवारी सकाळी आपण अंगण झाडतो त्यापूर्वी अंगणात 2 मग पाणी टाकावे व त्या नंतर झाडून काढावे.
या उपायाने ज्या व्यक्तीने आपल्यावर काही करणी केली असेल ती हा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. ती करणी त्यांच्याकडेच परत जाते.
तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रोजही करू शकता आणि शक्य नसेल तर फक्त शनिवारी व रविवारी केला तरीही चालेल. घरातील फरशी पुसताना त्यात एक मूठ मीठ टाकावे व त्या पाण्याने फरशी पुसावी.
यामुळेही घरातील नकारात्मकता निघून जाते. प्रत्येक सोमवारी मुख्य द्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण जरून लावावे व पुढील सोमवारी जुने तोरण काढून टाकून द्यावे व नवीन लावावे.
यामुळे घरातील सर्व सदस्यांचे स्वास्थ्य चांगले राहते व कोणी नेहमी वरचेवर आजारी पडत असेल तर तेही बंद होते. जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावावे
व हे तोरणही आठवडाभर राहू द्यावे व पुढील बुधवारी बदलावे. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता जाणवत नाही. घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपतींचे फोटो किंवा चित्र जरूर लावावे.
पण असे म्हणतात की गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता असते म्हणून आपण घराच्या बाहेर एक गणपतीचा फोटो लावला असेल तर अगदी त्याच्या मागेच गणपतीचा फोटो आतील भिंतीवरही लावावा.
यामुळे गणपतीच्या पाठीमागील दरिद्रता आपल्या घरात येणार नाही. आपल्या घरात जागोजागी देवी देवतांचे फोटो किंवा मुर्त्या आपण आणून ठेवू नये. करणं देव ही काही शोभेची वस्तू नाही.
जर आपण त्यांना शोकेसमध्ये शोभेची वस्तू म्हणून लावले तर तेही आपली शोभा करून टाकतात. म्हणून त्यांना घरातील देवघरातच ठेवावे इतर ठिकाणी मांडून ठेवू नये. श्री स्वामी समर्थ
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.