नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते.
त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.
विष्णू आणि माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद मिळवण्यासाठी दसऱ्याच्या आपट्याच्या पानांचा हा छोटासा उपाय करा. विजयादशमी दसरा या वर्षी 24 ऑक्टोबर मंगळवार या दिवशी आहे आणि या दसर्यानिमित्त आपण अर्पण करतो ती आपट्याची पाने मनोभावे देवावर चढवली जातात.
अर्पण केली जातात. मित्रमंडळींना आपट्याची पाने सोनं म्हणून आपण एकमेकांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. जे आपल्यापेक्षा वयाने नात्याने जेष्ठ असतात अशा ज्येष्ठ व्यक्तींचा आपण आशीर्वाद घेतो
आणि त्यांच्याकडून सुद्धा सोन स्वीकारतो. त्यांनाही देतो . या आपल्या हिंदू धर्मशास्त्रात खूप मोठा महात्म्य सांगितलेल आहे, ईश्वरी तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आणि क्षमता या आपट्याच्या पानामध्ये असते.
म्हणूनच दसऱ्याच्या विजयादशमीच्या या आपट्याच्या पानांचा हा एक छोटासा टोटका करा. संपूर्ण वर्षभर आपल्या घरात वैभव पैशांची कमतरता कधीच येऊ देणार नाही. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी दसरा आणि म्हणूनच जगातील केलेले कोणतेही टोटके यादिवशी केल्यास अत्यंत प्रभावशाली असतात.
फलदायी असतात. त्यांच फळ आपणास तात्काळ प्राप्त होतं. ओम अपराजिताय नमः या मंत्राचा जप शुभ मुहूर्तावर बोला. हनुमान चौपाई मधील हा 1 मंत्र आहे. त्यामुळे जीवनात असणारी सर्व समस्या नष्ट होईल. त्यामुळे जीवन सुखी आणि आनंदी होईल.
श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला,
तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. तेव्हापासूनच हे सोने लुटण्याची प्रथा निर्माण झालेली आहे.
थोडक्यात या आपट्याच्या पानात मध्ये ईश्वरी तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे.शक्ती आहे. प्रभू श्रीरामाच तत्त्व आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा ही पाने आपल्या देवघरामध्ये दसऱ्याच्या दिवशी अर्पण करणार आहोत आपल्या ग्रामदैवत असेल त्याठिकाणी आपण देणार आहोत.
तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा याच दसऱ्याच्या रात्री आपण जी पाने सर्व देवदेवतांना आपल्या देवघरात अर्पण केलेली आहे किंवा त्यांच्यासमोर हात जोडून प्रार्थना करून त्या ठिकाणाहून उचला
आणि आपल्या तिजोरीमध्ये बॉक्समध्ये कपाटामध्ये जिथे तुम्ही तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी ठेवून या वर्षभर या पानांची काळजी घ्या. अशा ठिकाणी वस्तूने पानांची इजा होणार नाही याची काळजी घ्या.
त्या ठिकाणी वस्तू ठेवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. ईश्वरी तत्त्व असणारी ही पाने जोपर्यंत तुमच्या घरात राहतील संपूर्ण वर्षभर वैभव पैसा कधीच कमी पडणार नाही. नवरात्रीच्या निमित्ताने भगवान श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.