प्रत्येक आईला या किचन टिप्स माहीत असायलाच पाहिजे..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घराचे स्वयंपाकघर बनवताना गॅस स्टॉपचा प्लॅटफॉर्म म्हणजेच स्टोव्ह पूर्व आणि दक्षिण दिशेला वेढला पाहिजे. स्वयंपाकघरात स्टोव्ह अशा दिशेला ठेवा की स्वयंपाकाचे तोंड पूर्वेकडे असेल. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील गॅस किंवा अग्नीशी संबंधित वस्तू आग्नेय दिशेला असाव्यात.वास्तूनुसार स्वयंपाकघरात सिंकचे विशेष महत्त्व आहे,

कारण भाजी धुण्यापासून ते जेवल्यानंतर भांडी धुण्यासाठी त्याचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील सिंक नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असावे.

सिंकचा नळ या दिशेला असावा जेणेकरून स्वयंपाकाचे तोंड उत्तरेकडे असेल. चुकूनही स्वयंपाकघरातील सिंक नैऋत्य दिशेला ठेवू नये. स्वयंपाकघरात आग आणि पाणी एकमेकांच्या जवळ ठेवू नये. असे केल्याने कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होते.

स्वयंपाकघरात हिरव्या, मरून किंवा पांढऱ्या रंगाचे संगमरवरी किंवा दगड वापरावेत. स्टोव्हच्या वर कोणत्याही प्रकारचे शेल्फ किंवा रेक असू नये. अनेकदा आपण आठवड्याची भाजी आणतो.

त्यामध्ये मिरची, लिंबू आणि कोथिंबीर हे देखील आणले जाते. पण, प्रश्न पडतो की, हे साठवून कसे ठेवावे. कारण हे योग्य पद्धतीने साठवून ठेवले नाही तर ते जास्त काळ टिकत नाही.

त्यामुळे ते व्यवस्थित ठेवल्यास १ महिना तरी व्यस्थित राहण्यास मदत होते. हिरव्या मिरच्या ठेवताना त्याचे देठ काढून घ्यावे आणि मिरच्या एका डब्यात स्टोअर कराव्यात. याकरता डब्यात कागद ठेऊन त्यात मिरच्या ठेवाव्यात आणि वरुन पुन्हा कागद लावावा.

यामुळे मिरच्या जास्त काळ टिकण्यास मदत होते. कोथिंबीर ही जास्त काळ टिकत नाही अशी अनेक महिलांची तक्रार असते. अशावेळी कोथिंबीर चांगली स्वच्छ करावी आणि एका डब्यात टिशू पेपर ठेऊन त्यावर कोथिंबीर ठेऊन पुन्हा त्यावर टिशू पेपर सेट करावा,

यामुळे कोथिंबीर अधिक काळ टिकण्यास मदत होते. कडीपत्ता बाजारातून आणल्यानंतर एक ते दोन दिवसात खराब होतो. अशावेळी त्याची पाने काढून एका डब्यात स्टोअर करुन ठेवावा. यामुळे कडीपत्ता दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

अनेकदा साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना तो भांड्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी सर्वप्रथम भांड्याला तेल किंवा तूप लावावे आणि नंतर पाक करावा. यामुळे पाक भांड्याला चिटकत नाही.बऱ्याचदा गुलाबजाम घट्ट होतात.

तर अनेकदा आतले पीठ कच्चे राहते, अशावेळी गुलाबजाम तयार करताना किंवा ते जाळीदार आणि स्वादिष्ट होण्यासाठी माव्यामध्ये थोडे पनीर किसून घालावे, यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होण्यास मदत होते.

रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी साखरेत ज्यावेळी रसगुल्ला टाकल्यावर फुलतो त्यावेळी त्याच्या मध्यभादी १ ते २ चमचे पाणी घालावे. यामुळे रसगुल्ला अधिक स्पंजी होण्यासाठी मदत होते.

आपल्याला अनेकदा बिर्याणी तयार करण्यासाठी कुरकुरीत कांदा लागतो. अशावेळी काय करावे, असा मोठा प्रश्न पडतो. पण, तुम्ही कांदा भाजताना त्यात थोडीशी चिमूटभर साखर घातल्यास कांदा चांगला भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो.

बऱ्याचदा आपण पाहतो दुधावर अधिक घट्ट साय येत नाही. अशावेळी काय करावे? हा मोठा प्रश्न पडतो. जर तुम्हाला अधिक घट्ट साय हवी असेल तर दूध चांगले उकळवून घ्यावे आणि त्यानंतर ते दूध एका बाजूला ठेवावे. थंड झाल्यानंतर तो टोप फ्रिजमध्ये ठेवावा. यामुळे दुधावर चांगली घट्ट साय येण्यास मदत होते.

अनेकदा दहीवडे कठिण राहतात. ते सॉफ्ट होण्यासाठी उडदाच्या डाळीमध्ये थोडा रवा घालावा आणि चांगले फेटून घ्यावे. यामुळे दहीवडे सॉफ्ट होण्यास मदत होते.स्वयंपाकघरात वस्तू ठेवण्यासाठी स्लॅब, कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करणे शुभ असते.

किचनमध्ये स्टोव्ह मुख्य दरवाजातून दिसतो अशा दिशेला ठेवू नका. स्वयंपाकघर नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व कोपर्यात बनवावे. या दिशेला बांधणे शक्य नसेल तर उत्तर-पश्चिम कोपऱ्यातही बांधावे. स्वयंपाकघराची उंची 11 फुटांपेक्षा कमी नसावी.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!