नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ओळी बोलून करा मातेचा जय जयकार, साक्षात देवीमाता तुमच्या घरी येईल, प्रसन्न होईल, कृपा करील आणि प्रत्येक गोष्टीची तुमच्या घरात कमी होऊ देणार नाही.
नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात, पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत अत्यंत महत्त्वाचा असतो. या वेळेमध्ये आपण आपल्या घरात घटाची स्थापना झाली असेल किंवा अखंड दिवा लावला असेल
किंवा यापैकी काहीच आपण केलं नसेल, घटाची स्थापना सुद्धा नाही किंवा अखंड दिवस सुद्धा केलं तरीही चालतं.
अशी मान्यता आहे की तुम्ही स्वतः नवरात्रीमध्ये हे काम चुकून सुद्धा करू नका. यातले पहिले काम आहे ते म्हणजे भांडण, घरामध्ये भांडण करू नका, होणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या, कटकटी, वाद घरामध्ये झाला नाही पाहिजे.
रुबाब विवाद घरात झाले नाही पाहिजेत याची काळजी नक्की घ्या, कारण जिथे भांडण ,वाद असतात तिथे नकारात्मक ऊर्जा,अभक्ती जास्त असते,त्यामुळे तिथे देवीचा वास रहात नाही, मन चंचल राहते.
या नऊ दिवसांमध्ये याची काळजी तुम्ही घ्या. जास्तीत जास्त आनंद घरी कसा राहील, शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करा. दुसरे काम म्हणजे शक्यतो कधीच व्यसन करू नये म्हणून व्यसनी माणसांनी व्यसन करू नये,
मग ते कोणतेही व्यसन असू द्या ते या नऊ दिवसांमध्ये व्यसन करू नका. यामुळे देवी रुष्ट होते व अरिष्ट घटना घडू शकतात. त्यानंतर मांसाहार तुम्ही या नऊ दिवसांमध्ये करू नका, घरी बनवू नका,बाहेर देखील खाऊ नका, घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत तुम्ही नॉनव्हेज चुकूनसुद्धा खाऊ नका.
यानंतर आहे ते म्हणजे घरात घाण कचरा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्न करा, व देवीची प्रसन्न मनाने पूजा,भक्ती करा. देवी नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण करतील.
नंतरचे काम आहे ते म्हणजे घरातल्या किंवा बाहेरच्या कोणत्याही स्त्रीचा लहान-मोठी कोणतीही स्त्री चा तुम्ही अपमान करू नका.
नवरात्र ही देवीची असते त्यामुळे सर्व स्त्रियांची रूप यांचा आदर करून नमन करावे, कधीच स्त्रियांचा अपमान करू नये, कारण देवीचं,लक्ष्मीचं रूप असतात या स्त्रिया. ही जी महत्वाची काम आहेत ती चुकूनही करू नका.
नऊ दिवस आपल्या देव घरामध्ये पूजा पाठ करायचं. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती ना कोणती देवी देवीची पूजा करायची. तसेच नैवेद्य दाखवायचा आहे, नवरात्रीमध्ये देवी पृथ्वीचे भ्रमण करते.
प्रत्येकाच्या घरोघरी माता येत असते म्हणून तुम्ही तुमच्या घरीच हा उपाय करू शकता आणि फक्त रोज संध्याकाळी तुम्हाला हा जय जय कार करायचा आहे. संध्याकाळी देव पूजेच्या वेळेस जेव्हा देवपूजा करतो, आरती करतो, दिवा लावतो त्यावेळेस हात जोडून तुम्हाला बोलायच आहे आणि मातेचा जय जय कार करायचा आहे . या ओळीचा जयजयकार करा.
उदयोस्तू श्री महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती नमो नमः राजराजेश्वरी आईसाहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय , असा जयजयकार तुम्हाला फक्त एक वेळेस बोलायचं आहे.
रोज सकाळी दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मातेसमोर अखंड दिवा लावा. मूर्ती समोर बसून हात जोडून करायचे आहे. या ओळी बोलायचा आहेत. श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने मातेला वंदन करायच आहे. माता साक्षात नवरात्रीमध्ये प्रसन्न होईल. रोज संध्याकाळी तुम्ही नक्की जप करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.