नवरात्रीत अशी करा जादूची पोटली, मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवा ही वस्तू !

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवरात्र सुरू आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात.

नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे, संपुर्ण नउ दिवस देविची पुजा अर्चा आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देविची अनेक रूपं या नउ दिवसात पुजतात. हिंदु धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे बघीतल्या जाते.

नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्ती देवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा उत्सव चालतो.

सर्वजण देवीची मनोभावे पूजा करत आहेत, देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत आहेत, प्रार्थना करत आहेत, नवरात्र म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा अनोखा संगम, या आठ नऊ दिवसात जी व्यक्ती मनोभावे देवीला शरण जाते,

देवीची पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देवी नक्की पूर्ण करते. तुम्ही तुमच्या घरात घटाची स्थापना केली असेल तर सकाळ संध्याकाळ देवीजवळ कापुराची आरती जरूर करा आणि जर घटाची स्थापना तुमच्या घरात केली नसेल तरीही सकाळी सायंकाळी देवाजवळ कापुराची आरती करावी.

देवी प्रसन्न होते. घरात घटाची स्थापना करून पुढील नऊ दिवस त्याची पूजा करून दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते.

नवरात्रीमध्ये आदिशक्तीची मातृशक्तीची पूजा केली जाते कारण सृष्टीला आपल्या मायेने सांगणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते. नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस पूजन आणि भजन केले जाते.

या सगळ्याबरोबरच देवीला मनोभावे प्रार्थना देखील करावी. प्रार्थना करताना ती अशी करा,माते आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्तमात्र आहे, इतरांपेक्षा मला तू भरपूर दिल आहेस, दिवस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाचे ताकद दे,

तुझी आठवण सतत होऊदे, मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ देत, चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल, भक्ती करताना हे शरीर तुझे आहे , या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे,

माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने सुखरुप होऊदेत. हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. रोज सकाळ संध्याकाळ देवीला अशी प्रार्थना करा. 7 कवड्या, 7 लवंग, 7 गोमती चक्र आणि थोडे धने व तांदूळ रात्री माते चरणी ठेवा.

सकाळी उठून ते लाल पिशवीत बांधून मुख्य दरवाजा वरती लटकवा. ते तुमचं धन स्त्रोत निर्माण करेल. या ना त्या प्रकारे पैसा घरात येईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!