नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 2023 सालातील शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर यादरम्यान आहेत. या शारदीय नवरात्रात कोणत्याही दिवशी हा एक टोटका नक्की करून पहा. घरातून गरिबी निघून जाईल.
तुम्ही जितकी मेहनत करत आहात, तितका पैसा नक्की येऊ लागेल. यासाठी आपल्याला साधारणतः पाव ते अर्धा किलो म्हणजे पावशेर ते अर्धा किलो अक्षत म्हणजेच न तुटले फुटलेले जे आहेत.
हे तांदूळ घेतल्यानंतर ते कुंकुवाच्या सहाय्याने आपण रंगवायचे आहेत. त्याला लाल रंग प्रदान करायचा आहे आणि ते सावली मध्ये किंवा उन्हात सुकवायचे आहेत.
हे लाल रंगाचे अक्षत म्हणजेच तांदूळ याचाच उपयोग करुन आपण हा टोटका करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरातील उत्तर दिशेकडेची भिंत आहे. त्या भिंतीची जागा स्वच्छ करून घ्या,
एक स्वच्छ सुंदर असं त्या ठिकाणी स्वतःसाठी आसन अंथरा आणि स्वतः उत्तरेकडे मुख करून बसा. आपलं तोंड उत्तरेकडे अशाप्रकारे आपण बसा. त्यानंतर कुंकवाने जमिनीवरती एक स्वस्तिक आपण रेखाटायचे आहे व तिच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरू नका.
स्वस्तिक वर आपण ते लाल रंगाचे रंगवलेले अक्षत आहेत त्या अक्षताची ढेरी आपण त्या ठिकाणी करायचा आहे, त्या स्वस्तिक वर आणि त्यानंतर त्या तांदळाच्या ढेरी वर त्या ठिकाणावर एक श्रीयंत्र आपण ठेवायच आहे.
हे श्रीयंत्र तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात मंदिराशेजारी असलेल्या भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. हे श्रीयंत्र पितळी किंवा तांब्याच असावं. श्रीयंत्र त्या ठिकाणी त्या तांदळाच्या ढिगावर ठेवा आणि नऊ दिवे हे नऊ दिवे मातीचे असावेत किंवा कणकेच्या पिठाचे नऊ दिवे आपण घ्यायचे आहेत
आणि त्यामध्ये तेल जर वापरणार आहोत ते तिळाचं तेल असेल किंवा शेंगदाणा यापैकी कोणतीही तेल चालते. नऊ दिवे त्या तांदळाच्या ढेरी सभोवार सर्व बाजूंनी आपले नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहेत.
आणि त्या ठिकाणी बसून जय मातादी, जय मातादी, जय मातादी, जय मातादी या मंत्राचा 108 वेळा जप करा. आपण दुर्गा चालीसा चा पाठ पाच वेळा केला तरीही चालेल. दुर्गा चालीसा पाठ किंवा दुर्गासप्तशती म्हंटला तरीही चालेल.
श्रवण केलं तरीही चालते. त्यानंतर आपण मातेची कापराने आरती ओवाळायची आहे आणि त्याच ठिकाणी पाच ते दहा मिनिटे आपण बसायचा आहे. देवीचे नामस्मरण करायचा आहे आणि सर्वात शेवटी जी समस्या आहे,
मनोकामना इच्छा आहे ते आपण बोलून दाखवायची. नतमस्तक व्हा. आपला माथा आपले डोके खाली ठेवा आणि मातेकडे या नवरात्रीच्या निमित्ताने तुमची इच्छा बोलून दाखवा आणि त्यानंतर श्रीयंत्र आहे लगेच काढायचे नाही.
त्या ठिकाणी ते दिवसभर असू देत आणि मग संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे श्रीयंत्र आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करा. आपल्या देवघरात ठेवा . अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे.
तांदूळ जे आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण कोणत्याही एखाद्या झाडाखाली पक्षांसाठी चिमणी कावळा असेल त्याच्या करता टाकू शकता. कणकेचे दिवे असतील ते तुम्ही गाईला खाऊ घातले तरी चालते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.