नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक महिन्याची अमावस्या असली तरी अश्विन महिन्यात येणारी अमावस्या सर्वात विशेष मानली जाते. ती सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते. पितृ पक्षामध्ये सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांना निरोप दिला जातो.
श्राद्धासाठी हा दिवस उत्तम आहे. असे म्हटले जाते की, जे लोक संपूर्ण पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंड दान देऊ शकले नाहीत. ते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी पिंड दान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे.
पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे, तर सर्वपित्री अमावस्येला समाप्त होईल. या वर्षी सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबर 2023, शनिवारी आहे. शनिवार असल्याने याला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल.
2023 सालचे दुसरे सूर्यग्रहणही याच दिवशी होत आहे.श्राद्धविधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. त्यासाठी कुतुप आणि रौहीन मुहूर्त पाळल्या जातात. सूर्यास्तापूर्वी श्राद्ध करावे.
पितृपक्ष चालू आहे. आता सर्वपित्री दर्श अमावस्या उद्या आहे, भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला सर्वपित्री दर्श अमावस्या म्हटले जाते. त्या दिवशी पितृतर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते .या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या म्हणजे मोक्ष प्रदान करणारी अमावस्या देखील म्हणले जाते.
सर्वपित्री दर्श अमावस्या 14 ऑक्टोबर रोजी असणार आहे. सर्वपित्री अमावस्या तिथीस पितरांचे श्राध्द केले जाते.सर्वपित्री अमावस्या श्राद्ध करण्याची सर्वात शेवटची तिथी आहे, या दिवशी त्या सर्वांचे तर्पण,श्राद्ध केले जाते ज्यांचे घास टाकणारे कोणी नसते किंवा कोणी करीत नाही त्याशिवाय ज्यांना श्राद्ध तिथी माहीत नसेल त्यांनी ही तर्पण केले जाते.
या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो व जीवनभर आयुष्यात सुख समृद्धी राहते.सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
अशा स्थितीत या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दान करणे चांगले मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात. याशिवाय पितरही तृप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते.
पितरांचे आशीर्वाद खूप खास मानले गेले आहेत, असे म्हणतात की काही अडचण असेल किंवा कोणत्याही कारणाने आपण आपल्या पितरांची सेवा करावी,अडचणी निघून जातात. काही कारणास्तव पितरांच्या श्राद्ध तिथीस श्राद्ध व तर्पण केले नाही तर सर्वपित्री अमावस्येला जरूर करावे.
सर्वपित्री अमावस्या तिथीस तर्पण व पिंडदान करून पितरांना मोक्ष मिळवून देतात. सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षसाठी शेवटचा दिवस असतो. सर्वपित्री अमावस्येला संध्याकाळी आपल्या पूर्वजांना निरोप देण्याचे विधान आहे.
सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत व पितरांसाठी श्राद्ध करावे. आपल्या पूर्वजांसाठी तर्पण व पिंडदान हे घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आद्यकर्तव्य आहे.
घरातील ज्येष्ठ सदस्य असतील त्यांनी तर्पण व पिंडदान करावे. भात आणि काळे तीळ यांचे मिश्रण करून त्याची पिंड बनवावी, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्वात आधी श्राद्धाचे भोजन करावे व गाय , कावळा आणि कुत्रा त्यांना द्यावे.
अशी मान्यता आहे की आपले पूर्वज कुत्रा, कावळा, गायीच्या रुपात येऊन भोजन ग्रहण करतात. कावळा हा यमदूत आहे. या दिवशी गरीब व गरजू लोकांना भोजन व दक्षिणा देऊन गरूड पुराणाचे पठण करावे. तसेच पितृपक्षासंबंधित मंत्राचा जप करावा.
सर्वपित्री दर्श अमावस्याला चांदीच्या वस्तूंचे दान केल्यास आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्या वंशजांना सुखी बनवतात. या दिवशी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा लावून आपल्या हातात घ्यावा,
एका तांब्यात पाणी घेऊन घरात चार दिवे लावून उंबरठ्यावर ठेवावेत, प्रार्थना करावी की आज संध्याकाळपासून पितृपक्ष समाप्त होत आहे. आता तुम्ही आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या लोकात सुखाने परत जावे.
सर्वांवर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादातून घरात मंगलमय वातावरण असू द्या, असे म्हणून हातातील एक दिवा एक तांब्या पाणी घ्यावे, तेथे जाऊन श्री हरी विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवून द्यावा व ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. अशा प्रकारे पितरांना निरोप द्यावा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.