नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सर्वपित्री अमावस्या तिथी शनिवारी आहे. शास्त्रानुसार पिपळाच्या झाडावर सर्व देवी-देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा कायदा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.
असे मानले जाते की अमावस्या तिथीला पिंपळाची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात. या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, काळे तीळ आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केले जाते.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात अनेक उपाय केले जातात. त्यात सर्वात जास्त प्रचलित गोष्ट म्हणजे श्राद्ध पक्षात दिला जाणारा पंचबळी. गाय, श्वान, कावळा,मुंगी व देवीदेवतांना अन्नदान देणे.
म्हणजेच पितृपक्षात जे आपण अन्न बनवतो, यात विशेषतः खीर बनवली जाते. असे केल्याने आपले पितृदेव आपल्यावर प्रसन्न होतात. या परंपरेमागे धार्मिक कारणे आहेत. कोणाला काय दान द्यावे , कधी द्यावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे मानले जाते.
भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या क्रियेला पंचबळी म्हणतात कारण, आपण पितृपक्षात जे भोजन बनवितो त्याचा एक भाग एका पानावर काढून पश्चिम दिशेला गाईसाठी ठेवला जातो.
कारण गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर स्वर्गात जाताना जी नदी पार करावी लागते ती आहे वैतरणा नदी आणि ती नदी पार करण्यासाठी आपल्याला गाईची मदत होते. त्याशिवाय गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवीदेवतांचे वास्तव्य असते आणि आपण जर गाईला अन्न दिले तर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात.
पितृपक्षातील अन्नाचा एक भाग कुत्र्यासाठी काढला जातो, याला म्हणतात श्वानबली, एका पत्रावळीवर हे अन्न काढावे, कुत्रा हा यम राजाचा पशु आहे, म्हणून श्राद्धाचा चा एक भाग आपण त्याला दिला तर यमदेव खुश होतील.
यानंतर आहे काकबळी, कावळ्यांसाठी अन्नातील एक भाग छतावर ठेवला जातो, शास्त्रा अनुसार कावळा यम देवांचे प्रतीक आहे, जो दिशांचे शुभ अशुभ संकेत आपल्याला देत असतो. म्हणून श्राद्धाचा एक भाग कावळ्याला दिला जातो.
कावळ्यांना आपल्या पितरांचे रूप मानले जाते आणि श्राद्धाचे भोजन कावळ्यांना दिल्यास पूर्वज प्रसन्न होतात व श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींना आशीर्वाद देतात. यानंतर आहे देवबली, देवांना जो नैवेद्य दाखवला जातो तोच म्हणजे देवबली.
पंचबली पैकी एक भाग म्हणून अग्नीला अर्पण केला जातो त्यामुळे हे अन्न देवापर्यंत पोहोचते. त्यासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या करून त्यांचा अग्नी प्रदीप्त केला जातो व त्यावर साजूक तूप टाकून अन्नाचे पाच भाग टाकले जातात.
अशा प्रकारे देवबळी करून त्यांना भोजन दिले जाते व अशाप्रकारे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात . शेवटचा पाचवा बली म्हणजे तो मुंग्या – जीव जंतू हे भोजन खाऊन तृप्त होतात , मुंग्यांच्या वारूळजवळ हा भाग ठेवला जातो,
अशा प्रकारे भोजन देऊन सर्वाना तृप्त केले जाते. आपले पितर तृप्त व संतुष्ट होतात. अशाप्रकारे आपण पंचबली करून श्राद्धकर्म पूर्ण करू शकतो. परंतु यामध्ये गाईला शक्यतो हिरवा चारा खाऊ घालावा व गोशाळेत जाऊन तेथे दक्षिणा द्यावी.
किंवा एखाद्या गाईसाठी चारा व्यवस्था करावी. तांब्यात पाणी घेऊन त्यात दूध टाकावे व त्या पाण्याने दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने तर्पण करावे म्हणजे एका मुठीत काळे तीळ घेऊन मुठीवर पाणी सोडून ते अंगठ्याचा बाजूने खाली सोडावे.
यामुळेही आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि तेव्हा आपले पितर आपल्यावर खुश असतात त्यावेळी आपल्या जीवनात आनंदी आनंद असतो .
पितृपक्षात काळे तीळ जरूर घरी आणा. त्यामुळे पितर खुश होतील. घरी काळे तीळ आणून ते एक वाटीभर पाण्यात मिसळून घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा, मुख्य दरवाजा वरती देखील शिंपडा,
फक्त टॉयलेट,बाथरूम वर्ज्य आहे, तसेच त्या पाण्यात तुम्ही थोडं गंगाजल देखील टाका त्यामुळे तुमच्या जीवनात असणारी अडचण, त्रास दूर होईल, जर पाणी उरले तर तुम्ही ते तुळस सोडून घरातील कोणत्याही झाडाला अर्पण करा नसेल तर जवळच्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.
.पितृपक्ष या दिवशी संपेल त्यामुळे तुम्ही तुमच्या पितरांना सांगा विनंती व प्रार्थना करा की आपल्या घरातील सर्व बाधा, त्रास दूर लोटूदेत. जर पितर आपल्यावर प्रसन्न असले तर आपल्याला आनंदी, सुखी व समृद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
अशा प्रकारे हे छोटे-छोटे उपाय आपण करून आपल्या पितर देवांना प्रसन्न करू शकतो. चपातिवर भात ठेऊन मगच दान करा. पितृ संतुष्ट होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.