घटस्थापना करण्याची सर्वात सोपी विधी, ही पद्धत तुम्हाला कुणीच सांगणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम दुर्गादेवी नमः, घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार असून, २४ ऑक्टोबरला दसऱ्याला समाप्ती होईल.

पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या.शारदीय नवरात्रीचा काळ सुरू होत आहे. रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रीची सुरुवात होत आहे, नवरात्रीची समाप्ती मंगळवार, 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल,

तर विजयादशमी किंवा दसरा हा सण 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते.

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 पासून सुरू होईल. हे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 पर्यंत चालेल. पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदा तिथीला कलशाची स्थापना करून माँ दुर्गेचे आवाहन केले जाते.

घरच्या घरी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची ते बऱ्याच जणांना गोंधळ होतो. घटस्थापना कशी करावी, या बद्दल माहिती नक्की उपयोगी ठरेल. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते.

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. तसेच नवरात्रोत्सवाच्या वेळी, दुर्गा देवीच्या ९ अवतारांची संपूर्ण पारंपारिक आणि परंपरागत विधींनी पूजा केली जाते.

यावर्षीचे नवरात्र हे आठ दिवस चालतील. या आठ दिवसात देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो. नवरात्र म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा अनोखा संगम, या आठ नऊ दिवसात जी व्यक्ती मनोभावे देवीला शरण जाते, देवीची पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देवी नक्की पूर्ण करते.

यासाठी आपल्याला शेतातील काळी माती लागेल, त्यानंतर पत्रावळ लागेल, पाच प्रकारचे धान्य लागेल, गहू आणि इतर कडधान्ये त्यामध्ये लागतील व त्यानंतर विड्याची पानं लागतील, हळद कुंकू आणि बाकी इतर पूजेचे साहित्य लागेल.

पाटाच्या आकाराची रांगोळी काढून त्यावर हळद-कुंकू टाकावे आणि त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा, चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे, त्यानंतर एक छोटस टोपलं घ्या व त्या टोपल्यात किंवा परातीत शेतातील आणलेली काळी माती घालून त्यात पाच प्रकारचे मिश्र धान्य पेरावे.

धान्य पेरून झाल्यावर महत्त्व मधोमध एक कलश ठेवावा, कलशामध्ये हळद-कुंकू , सुपारी , अक्षता, दुर्वा सुट्टे पैसे टाकावेत, कलशावर हळदीकुंकवाची उभी बोटे काढा. कलशात भवताली विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवावा, नारळ ठेवून त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर ठेवावे.

हळद कुंकू अक्षता फुले वाहून किंवा फुलांचा हार लावून मनोभावाने पूजा करावी. त्यानंतर प्रत्येक दिवसाला एक फुलांची माळ कलशावर सोडावी आणि दर दिवशी नैवेद्य दाखवावा. नवरात्र काळात धूप दीप दाखवू शकता.

त्यानंतर परातीत किंवा टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी फुलाने पाणी शिंपडावे जेणेकरून नऊ दिवसात ते धान्य जोमाने वाढत, त्या वाढी नुसार आपल्या घराची भरभराट होते.

असे मानले जाते की अनेक जण घटस्थापना पासून पुढील नऊ दिवस उपवास सुद्धा करतात. यामध्ये काही जण निर्जळी उपवास करतात तर काही जण केवळ फलाहार करतात.

काहीजण उठता बसता म्हणजेच अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि नवमी या दिवशी फक्त उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडले जातात. या पद्धतीने घरच्या घरी सोप्या रीतीने तुम्ही घटस्थापना करू शकता.

तुम्ही घटस्थापना या पद्धतीनेच करा. नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ प्रार्थना, आरती करा. तसेच मोठा दिवा म्हणजेच नंदादीप लावावा, जेणेकरून दिवा विझणार नाही,सतत लक्ष देऊन तेल अथवा तूप घाला.

देवीची पूजा करताना आपण अनेक प्रकारची सामग्री देवीच्या चरणी अर्पण करतो. देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो परंतु हिंदू धर्मशास्त्रात विविध रंगाची फुले ही अत्यंत शुभ आणि देवीला अत्यंत प्रिय मानण्यात आलेली आहेत.

आपण नवरात्रीच्या आठही दिवसात लाल रंगाची फुले देविस नक्की अर्पण करा आणि त्यातल्या त्यात जास्वंदीचे फूल आणि कमळाचे फूल शक्य असल्यास जरूर अर्पण करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!