फक्त ही 1 वस्तू जवळ ठेवा, कोणी काहीच बिघडवू शकणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सनातन परंपरेत हळदीला खूप शुभ मानले जाते. हेच कारण आहे की तीज-सणापासून ते लग्नापर्यंत इत्यादी हळदीला धार्मिक, ज्योतिष आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर मानले जाते. हळद हे केवळ आरोग्यासाठीच चांगले नाही,

तर सर्व अडथळ्यांपासून आपले रक्षण करताना तुमचे सौभाग्य वाढेल असे मानले जाते. हळदीचा संबंध बृहस्पती देव यांच्याशी आहे आणि ज्यांना जीवनात सुख आणि समृद्धी हवी आहे, त्यांनी पूजेपासून खाण्यापिण्यापर्यंत हळदीचा वापर करावा.

जर तुमच्या कुंडलीमध्ये बृहस्पति कमकुवत असेल तर हळदीचे हे खात्रीशीर उपाय तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूजेत हळदीचा वापर केला पाहिजे आणि प्रसादाच्या रूपात कपाळावर टिळा लावला पाहिजे.

घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जा प्रवाह करण्यासाठी गुरुवारी घरात हळदीचे पाणी शिंपडले पाहिजे. हा उपाय केल्याने केवळ भगवान विष्णूच नव्हे तर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तू दोषही दूर होतात.

जर तुमच्या लग्नामध्ये विलंब होत असेल किंवा लग्नाच्या गोष्टी बिघडत असतील तर तुम्ही विशेषत: गुरुवारी पाण्यात एक चिमूटभर हळद घालून आंघोळ केली पाहिजे.

हळदीची माळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत, गुरुवारी, फक्त विष्णू किंवा देवगुरू बृहस्पती या मंत्राचा जप करण्यासाठी हळदीच्या माळीचा वापर करा. असे केल्याने हा मंत्र लवकरच सिद्ध होईल आणि तुम्हाला या दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील.

जर तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल आणि त्यात सतत अडथळे येत असतील तर तुम्ही देवगुरु बृहस्पतीच्या मंत्रांनी पूजलेल्या हळदीच्या माळा घाला.जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे वैवाहिक जीवन वारंवार कोणाची तरी दृष्ट लागत आहे,

तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मिळणारे प्रेम टिकवण्यासाठी घराबाहेर भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवा. हा उपाय केल्याने तुमच्या सुखी वैवाहिक आयुष्याला कोणाचीही नजर लागणार नाही.

आपल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये एक हळकुंड आणि त्यासोबत अजून काही धन समृद्धी कारक वस्तू आपण नक्की ठेवा . या वस्तू ठेवण्यापूर्वी एक मंत्र म्हणावा, आणि त्या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरात सुख समृद्धी नांदू लागते . आपले गरिबीचे दिवस बदलतात.

गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पती यांचा वार मानला जातो आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात देवगुरु बृहस्पतींची कृपा बरसते त्या व्यक्तीला अपार धन प्राप्ती होते, म्हणजेच धनवैभव , पैसा त्या व्यक्तीच्या जीवनात नक्की येतो.

गुरूवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे , अगदी शुक्ल पक्ष असेल किंवा कृष्ण पक्ष असेल कोणत्याही पक्षातील कोणताही गुरुवार हा उपाय करण्यासाठी अतिउत्तम मानला जातो आणि एकदा हा उपाय केल्यानंतर हा उपाय आपण पुढे येणार्‍या कोणत्याही गुरुवारी पुनरावृत्त करू शकता.

म्हणजे रिपीट करू शकता. त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो . हा उपाय देवगुरु बृहस्पतीना प्रसन्न करतो, सोबतच देवी-देवतांचे जे कोषाध्यक्ष आहेत, कुबेर महाराज , हा गुरुवार कुबेर देवाचा सुद्धा वार मानला जातो. या दिवशी केलेली देवगुरु बृहस्पती यांची पूजा , भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करते .

आपण हा उपाय करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. स्वच्छ स्नान करावं . ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर उठावे आणि ज्यांना शक्य होत नाही ब्रह्म मुहूर्तावर उठणे त्यांनी कमीत कमी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठावं.

स्वच्छ स्नान करावं. स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि त्यानंतर आपण आपली देवपूजा करतो त्याच प्रकारे आपण देवपूजा करायची आहे आणि ही देवपूजा करत असताना आपल्या देवघरासमोर स्वच्छ पाटावरती एक लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचा कपडा अंथरावा

आणि त्या कपड्यावरती आपण एक हळकुंड ठेवा . हळकुंड खराब झालेलं/ सडलेलं किंवा त्याला कीड वगैरे लागली नसावी, असे घर हळकुंड पाटावरती, लाल वस्त्रावर ठेवायच आहे.

तुमच्याकडे गोमती चक्र असतील तरी गोमती चक्र गंगाजलाने स्वच्छ धुवून, गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन हे गोमती चक्र सुद्धा घेऊ शकता. लक्ष्मीची कवडी देखील चालते , कोणतीही एक कवडी आपण त्या ठिकाणी आवश्य ठेवावे.

जर केशर असेल तर केशराचे 2 काड्या ,या वस्तू लक्ष्मी कारक, समृद्धी कारक आहेत या वस्तू ज्या ठिकाणी असतात माता लक्ष्मी त्या ठिकाणी नक्की धावून येतात. लक्ष्मीची कृपा नक्की बरसते.

जितक्या वस्तू तुमच्याकडे असतील तितक्या वस्तू या ठिकाणी ठेवाव्यात आणि तांबे या धातूपासून बनवलेलं कुबेर यंत्र असेल तर सुद्धा या लाल रंगाच्या वस्त्रावरती आपण ठेवू शकता आणि त्यानंतर आपण मनोभावे आपली देवपूजा करायची आहे.

देवपूजा करताना या ज्या वस्तू ठेवल्या आहेत यांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावू शकता , ही पूजा करून घ्या, आणि पूजा संपन्न झाल्यानंतर एक मंत्र, या वस्तूंना अधिक बलवान बनवतो, या वस्तूंमध्ये देवत्व आपल्याला आकृष्ट करायच आहे, त्या देवत्वाला आकृष्ट करण्याचे कार्य हा मंत्र करतो,

मंत्र आहे. ओम बृम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून त्या लाल कपड्यातच आपण या वस्तू गुंडाळून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल,

सातत्याने या वस्तू तुमच्या सोबत ठेवा आणि तुमच्या सोबत ठेवणे शक्य नसेल तर आपल्या पर्स/ पॉकेट/ तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता, तशा ठिकाणी या वस्तू तुम्ही ठेवा.ज्या ठिकाणी या वस्तू असतील लक्ष्मी माता पैसा वैभव ऐश्वर्य आपोआप देईल, यांचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!