नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपली सकाळ जर प्रसन्न झाली तरच आपला दिवस चांगला राहतो नाहीतर दिवस खराब जातो, चिडचिड होते, राग येतो तसेच बऱ्याच समस्या येतात. याउलट जर आपण सकाळची सुरुवात प्रसन्न केली,
आपल्या शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण सकाळी उठल्यावर केल्या तर सर्व दिवस शुभ घटना घडतात जरी अचानक संकट आले तरी मूड खराब होत नाही.
या मंत्रांच्या उच्चारामुळे आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते, त्यामुळे आपल्या आसपासचे वातावरण सकारात्मक बनते. आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या जीवनात आपल्याला अशा संधी प्राप्त होतात.
त्यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपले जीवन सुखी व समृद्ध होते. मंत्राचा प्रभाव आपल्या जीवनावर पडून आपल्याला लगेच इच्छित फळ मिळते. महादेव हे देवादी देव आहेत.तसेच भोळे सांब आहेत.
महादेवाच्या फक्त नित्य स्मरणाने आपली सर्व वेदनेपासून सुटका होते. महादेवांचे वास्तव्य हे सर्वत्र आहे म्हणून त्यांच्या शक्तीला जागृत करण्यासाठी त्यांच्या एका मंत्राचा विशिष्ट जप करणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यावर तुम्ही हे शब्द बोलू शकता, त्यासाठी स्नान करण्याची वाट पाहिली नाही तरी चालेल, अगदी उठल्यावर स्वतःच्या हाताचे दर्शन घेऊन आपण ईश्वराचे आभार मानतो की या सकाळी आपण जीवंत आहोत
व अजून एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे. त्यावेळी तुम्ही या शब्दांचा उच्चार करा. यामुळे वाणी शुद्ध होते, सकारात्मक विचारांच्या लहरी निर्माण होतात व सर्व काही मंगल भासू लागते. आपली सकाळ कशी होते,
त्यावरती बरेच काही अवलंबून असते, जर सकाळ प्रसन्न झाली तर संपूर्ण दिवस चांगला, मजेत जातो, जर सकाळी सकाळी कटकट झाली तर दिवसभर मूड ऑफ होतो. त्यामुळे सकाळ ही प्रसन्न झालीच पाहिजे तेंव्हाच तुमचा दिवस चांगला जाईल व तुम्ही तुमची कामे नीट, व्यवस्थित करू शकाल.
जे शिव भक्त आहेत, शंकराची पूजा करतात त्यांच्यासाठी हा मंत्र वरदानच आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत कोणीही या मंत्राचा जप वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकता.
ज्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, संतान प्राप्ती मध्ये बाधा येतात, अशा लोकांनी हा मंत्र जप उठल्यापासून ते रात्रीपर्यंत सतत करू शकता.
निरोगी जीवनासाठी हा मंत्र लाभकारक आहे, ज्यांना सतत आजाराचा त्रास आहे, ज्यांच्या घरी सतत क्लेश, भांडण होतात त्यांनी हा मंत्र जपल्याने घरात सुख व शांती येते. नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी,
आपल्या शत्रूंचा नाश व्हावा, धनलाभ व्हावा अशा अनेकानेक इच्छा पूर्तीसाठी आपण नक्कीच भोलेनाथ शंभो शिवाला प्रसन्न करून घेऊ शकता. हा मंत्र जप करताना भावना मात्र शुद्ध हवी व श्रद्धा पूर्ण हवी तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतात. I l ॐ जूं स माम् पालय पालय स: जूं ॐ l l
जर तुम्हाला दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची इच्छा असेल तर ती पूर्ण होते, हा मंत्र भगवान शंकर शंभोला प्रसन्न करण्यासाठी आहे. मनातील सर्व इच्छा या मंत्र जपाने पूर्ण होतात. तुमच्या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करण्याची ताकद यामध्ये आहे.
तुमच्या मार्गातील सर्व अडचणी, दोष, बाधा दूर होतील, सकारात्मक लहरी शरीरात कार्यरत राहतील, नेहमी उत्साह भरेल व असणाऱ्या अडचणींवर मात करण्याचं बळ भगवान भोलेनाथ आपल्याला नक्कीच देतील
कारण शिवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्रजप केला जातो व त्यासाठी कोणतीही विशेष पूजा अथवा विधी लागत नाही तर फक्त शुद्ध भावनेने व श्रद्धेने केल्यास मंत्र फलप्रद होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.