नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याला लहानपणा पासूनच शेअरींग शिकवली जाते. आपल्या गोष्टी शेअर केल्याने प्रेम वाढते असे म्हटले जाते. पण वास्तुशास्त्राच्या नियमांवरुन काही गोष्टी अशा असतात ज्या इतरांसोबत शेअर करणे म्हणजे स्वत:साठी त्रास म्हणण्यासारखे असते. या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्याने पैशांचीही हानी होते आणि विनाकारण अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक घरांमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक एकमेकांचे कपडे घालत असतात. तर असे करणे म्हणजे दुर्दैवाला आमंत्रण देणे होय. यामुळे नशीब कमी होते . त्याच प्रमाणे शरीरावर अॅलर्जीसारख्या अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे कोणाला कपडे देताना नक्की विचार करा.
तुमची लग्नाची अंगठी चुकूनही दुसऱ्याला घालायला देऊ नका.असे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात. अशी मान्याता आहे.इतरांचे घड्याळ घालणे किंवा आपले घड्याळ इतरांना घालण्यासाठी देणे हे तुमच्या करिअरमध्ये वाईट काळ आणू शकते.
त्यामुळे हे काम करणे टाळा.शूज आणि चप्पल शनिशी संबंधित आहेत. एकमेकांचे जोडे आणि चप्पल परिधान केल्याने शनिदोष होतो आणि शनिदोषामुळे जीवनात अनेक संकटे येतात.
सूर्यास्तानंतर आजूबाजूचे कोणी मीठ मागायला आले तर तुम्ही स्पष्टपणे नकार द्यावा. कारण सूर्यास्तानंतर एखाद्याला मीठ उधार दिल्याने पैशाचे नुकसान होते. असे मानले जाते की, ज्याप्रमाणे जेवणात मीठ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही मीठ असणे आवश्यक आहे.
स्वयंपाकघरातून मीठ संपल्याने कुटुंबाला त्रास होऊ शकतो, म्हणून स्वयंपाकघरातून मीठ कधीही पूर्ण संपू देऊ नका. तसेच कुणालाही मीठ देऊ नका.
जर एखाद्या व्यक्तीला मीठाची जास्त गरज असेल तर तुम्ही त्याच्याकडून काही पैसे किंवा नाणे घेऊन मीठ द्यावं.
वास्तूनुसार कांदा-लसणाचा संबंध केतू ग्रहाशी सांगितला गेला आहे. ज्योतिष शास्त्रात केतुला वरच्या शक्तींचा स्वामी मानले जाते. या ग्रहामध्ये जादूटोणासारख्या गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे सूर्यास्तानंतर कांदे आणि लसूण यासारख्या गोष्टी घेऊ-देऊ नयेत. असे केल्याने घरातील समृद्धी दूर होते.
हिंदू धर्मात हळदीला विशेष महत्त्व आहे. हळदीला पूजा आणि लग्नापासून अनेक कामांमध्ये शुभ मानले जाते. कारण हळदीचा संबंध गुरूशी आहे, असे मानले जाते. हळद अन्नाची चव आणि रंग वाढवते. हळद देखील कोणाला उधार देऊ नये.
त्यामुळे आर्थिक चणचण, शिक्षणाचा अभाव, लग्नकार्यात अडथळे येणे अशा समस्या उद्भवू शकतात.दुधाचा संबंध चंद्र आणि लक्ष्मी-नारायण यांच्याशी आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दूध आणि दुधाशी संबंधित गोष्टींचे दान किंवा उसणे देणे टाळावे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.