काय आहेत पितृदोषाची लक्षणं, तुम्हाला त्रास होत असेल तर हे उपाय लगेच करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जीवनात सुख-समृद्धी, यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे देव-देवतांची कृपादृष्टी आवश्यक असते, त्याचप्रमाणे पितरांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वादही महत्त्वाचा असतो, असं शास्त्र सांगतं. वर्षभरात विशिष्ट तिथींवर आपण देवदेवतांचं स्मरण, पूजन करतो, तसंच पितृपंधरवड्यात पितरांचं स्मरण करणं गरजेचं आहे. पितर हे आपल्या आणि देवांच्या मधला दुवा मानले जातात.

त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या पितृपंधरवड्यात पितरांसाठी श्राद्धविधी, पिंडदान, तर्पण करणं आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव पितर नाराज झाले, तर आपल्याला जीवनात अपयश, आजारपण, कर्ज आदी गोष्टींना सामोरं जावं लागतं, असं जाणकार सांगतात. त्यामुळे पितृपंधरवडा हा पितरांच्या स्मरणासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. या कालावधीत पितरांचं स्मरण महत्त्वाचं असतं. ग्रहदशा चांगली असूनही मला यश मिळत नाही, अशांत वाटतं, आर्थिक अडचणी भेडसावतात, अशा अनेक समस्या काही जण मांडतात.

यामागे पितृदोष हे एक कारण असू शकतं.आपल्या हिंदु संस्कृतीत मातृ-पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात रहातात, त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात.

ते नेहमी मुक्तीची वाट पहात तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश-अपयश पहात असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात, त्यांचे कल्याण होते.

आई-आजी-पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी-चोळी दान द्यावी अन् गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते. त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणेे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न-पाणी आणि औषधांवाचून तडफडून मरण येणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात.

ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात.

हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत रहातात आणि प्रगतीला खिळ बसते. प्रामाणिक माणसांचे अंतरंग पितरांना दिसते.हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत रहातात आणि प्रगतीला खिळ बसते.

प्रामाणिक माणसांचे अंतरंग पितरांना दिसते. त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते.

कोणत्याही कारणाने आपले पूर्वज नाराज झाले तर त्यामुळे त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागतो. पितरांना मोक्ष मिळाल्यानंतर ते पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात, असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं.

त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पणासारखे विधी करणं गरजेचं आहे.पितृपंधरवड्यात पितरांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तर्पण, पिंडदान किंवा श्राद्ध कर्म करावं, तसंच गरजू,ब्राह्मणास अन्नदान करावं, यामुळे पितृदोष दूर होतो. पितरांच्या नावानं पिंपळाचं झाड लावून त्यांना मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करावी.

सोमवती अमावस्येला पितरांच्या नावानं पितृभोग अर्पण करावा आणि त्यांच्या नावानं गोवऱ्या जाळून त्यात शुद्ध तुपाची आहुती द्यावी.

अकाली मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावानं नारायण नागबली विधी किंवा पितृ गायत्री विधी करावा. या विधींमुळे पितृदोष नाहीसा होतो. जीवनात सुख-समृद्धी येते. तसंच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

एखाद्या व्यक्तीला पितृदोष असतील, तर त्याची काही लक्षणं त्याला जीवनात दिसून येतात. घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा अपघात होणं, कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वाद होणं, व्यसन किंवा चुकीच्या माणसांची संगत लागणं,

कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबणं किंवा विवाह न होणं, लहान मुलं घरातल्या मोठ्यांचा आदर न करणं, आपापसांत भांडणं आणि मोठ्यांना त्रास देणं,

कुटुंबातल्या विवाहितेला गर्भधारणा न होणं किंवा नियोजित वेळेपूर्वी बाळ जन्माला येणं, नको असताना घरात मूल जन्माला येणं किंवा अपंग मूल जन्माला येणं हे पितरांच्या नाराजीचं लक्षण आहे.

घरातल्या सदस्याला आजार जडणं आणि दीर्घकालीन आजार होणं ही सर्व पितृदोषाची लक्षणं मानली जातात. त्यामुळे पितरांच्या शांती आणि मोक्षासाठी विधी, प्रार्थना करणं गरजेचं आहे, असं जाणकार सांगतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!