नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरु होतो हे आपल्याला माहित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
या कालावधीत केले जाणारे पींडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करत नाहीत तर ते मध्यान्येला करणे योग्य मानले जाते. याचे कारण म्हणजे या वेळात सावली मागच्या बाजूला पडते. या काळात ब्राह्मणांना दिले जाणारे भोजन हेही चांगले दान समजले जाते.
पितृदोषमुळे संतान सुख प्राप्ती होत नाही, तसेच वंशवृद्धी होत नाही. पैसा टिकत नाही आणि कुटुंबामध्ये अशांती येते अशा प्रकारच्या अनेक समस्या कुटुंबामध्ये येतात.
त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान तसेच श्राद्धकर्म केले जाते.
याशिवाय आपल्याला याच 15 दिवसांच्या काळात एक उपाय करायचा आहे, या उपायांमुळे आपल्या पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल आणि त्यांना मुक्ती मिळेल. हा चमत्कारिक उपाय म्हणजे, तुम्हाला या पितृपक्षात या 15 दिवसात तुम्हाला रोज रात्री एक दिवा लावायचा आहे.
संध्याकाळी 7 नंतर कधीही हा दिवा लावू शकता.याशिवाय हा दिवा तेलाचा किंवा तुपाचा काही कसाही दिवा तुम्ही लावू शकता. फक्त दिवा लावला पाहिजे. मग त्यानंतर तो दिवा तुम्हाला घरच्या बाहेर जावून लावायचा आहे.
म्हणजे घराच्या बाहेर तुम्ही मुख्य दाराच्या बाहेर जायचं आणि तुम्हाला पूर्व दिशेकडे तो दिवा लावायचा आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर ती पूर्व दिशाला कोणत्या स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाणी कुठेही तुम्ही फक्त हा एक दिवा पूर्व दिशेकडे वात करून लावायचा आहे.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा दिवा लावताना तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नाव घ्यायचा आहे.यामध्ये तुमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा असतील ,त्यांचे नाव तुम्हाला घेऊन तो दिवा रोज रात्री म्हणजे संध्याकाळी पितृपक्षात पंधरा दिवस रोज लावायचा आहे.
हा दिवा लावून पितरांचे स्मरण करावे, त्यांचं साहस, धैर्य स्मरण करावे त्यामुळे आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होईल, पितरांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील त्यामुळे कामातील सर्व अडचणी दूर होतील.
असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये, पूर्वज त्यांच्या कुटुंबियांसह राहण्यासाठी पृथ्वीवर येतात. एखाद्या व्यक्तीने अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे वडिलांना आनंद होईल.
तसेच यादरम्यान, वाईट सवयी, मादक द्रव्ये, पितृ पक्षात अल्कोहोल-मांसाहारी, लसूण-कांदा याचे सेवन करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र, त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता.
पितृपक्षात कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्याला त्रास देऊ नका, जर आपण त्यांना त्रास देत असू किंवा मारहाण करत असू तर अडचणीला आमंत्रण देत असतो. त्यापेक्षा या काळात घरी येणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्या.
असे मानले जाते की पूर्वज प्राणी आणि पक्ष्यांच्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबांना भेटायला येतात. म्हणून रोज न चुकता स्वयंपाक करताना पहिली भाकरी अथवा चपाती ही कुत्रा अथवा गाईला चारावी, यामुळे दोष नाहीसे होतात.
कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होतात. आपल्या पूर्वजांना आदर देऊन साधे जीवन जगा. कोणतेही शुभ कार्य करू नका.
पितृचे श्राद्ध हे स्वतःच्या घरीच करावे, कितीही जवळचे असले तरी कोणत्याही नातेवाईकांच्या घरी करू नये अथवा घरी शक्य नसल्यास प्रयाग, बद्रीनाथ इथे करावे. तसेच या काळात मंगल कार्य करू नयेत, तसेच पितरांचे स्मरण करून त्यांचा पराक्रम आठवावा.
बाहेरील अन्न आपण चुकूनही ग्रहण करू नये. पितरांच तर्पण श्राद्ध तिथीनुसार जरूर करा, सर्व अडचणी दूर होतील.
या 15 दिवसात हा उपाय नक्की करा. आपल्या घरी जी चपाती किंवा भाकरी करू ती पहिली पाहिजे ती घराबाहेर जाऊन मुख्य दरवाजावरून ओवाळून टाका. त्यामुळे तुमच्या घराची नजर बाधा दूर होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.