पितृपक्षात 15 दिवसात या गोष्टी नक्की करा, कोणताही पितृ दोष नश्ट होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भाद्रपद वद्य पंधरवडा यालाच पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस तीळ ,जव, हवन,तर्पण, पिंडदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थ याना जेवू घालावे. शांती, सूक्त पाठ, हवन करावी.

नित्यसेवा ग्रंथात लिहिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज घरातील मुख्य पुरुष यांनी पितृ सूक्त पठण करावे तसेच घरातील वृद्ध झालेल्या पूर्वजांच्या तिथिस व प्रत्येक अमावस्येला दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा फार भात, तूप, 5-7 काळे तिळ ठेवून दान करावे.

पुढील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करावा.ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व-सेव्याय धीमहि। शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्। यामुळे पितरांना सद्गती लाभते. घरात सवाष्ण स्त्री गेली असल्यास अविधवा नवमी श्राद्ध घालावे.

पितरांची तिथी माहित नसल्यास सर्वपित्री अमावास्येला त्यांचं श्राद्ध करावे. तसेच ब्राह्मणास दान द्यावे व अमावस्या तिथीला स्त्री मृत झाल्यास शिधा दान करावे. पितृपक्षात नारायण नागबळी सारखे विधी करू नयेत.

पितृ दोषा चे दुष्परिणाम खूप आहेत जसे की , विवाह होण्यात अडचण येणे, डिग्री असून पण नोकरी मिळत नाही, घरातील मुलांनी आई वडिलांचे न ऐकणे, व्यसन करणे, वाईट मार्गाला लागणे, घराण्यात आंतरजातीय विवाह होणे,

संतती न होणे किंवा झाली तरी न जगणे किंवा व्यंगत्व असणे, सर्व रिपोर्ट नॉर्मल असून पण संतानप्राप्तीत अडचणी येणे. घरात नेहमीच अघटीत होत राहणे, आर्थिक संकट येणे,

राहत्या वास्तूत निराश वाटणे, उदास वाटणे, नकारात्मक शक्ती घरात जास्त असणे, अमावस्या-पौर्णिमेला घरात भांडणे होणे, मोठ्या प्रमाणात वाद होणे, वैवाहिक जीवन सुखी नसणे, कायमस्वरूपी वाद-विवाद,

कटकटी होणे, नातेवाईक, शेजारी, कामाच्या ठिकाणी जे सहकारी असतील त्यांच्यासोबत वाद होणे, चूक नसतानाही आपल्यावरच दोष येणे, सर्व काही नीट होण्यासारखी परिस्थिती झाली की तेवढ्यात काहीतरी अघटित घडणे आणि सर्व जसेच्या तसे होणे.

पक्षात केलेल्या दानाचे खूप महत्व असते आणि त्याचे फळ पितृपक्षातील 16 दिवसात खूप मिळते. तर्पण, पिंडदान इत्यादी करून आपल्या पितरांना प्रसन्न केले जाते. धर्मशास्त्रानुसार पितृपक्षातील दान खूप महत्त्वाचे असते.

अशी मान्यता आहे की या कालावधीत पितरांसाठी केलेले दान त्यांना संतुष्ट करते. गोदान, धार्मिक दृष्टिकोनातून गाईचे दान श्रेष्ठ मानले जाते. गाय दान केल्याने सर्व सुख मिळतात. पितृपक्षात तिळाच्या दानाचे महत्त्व आहे,

याने आपल्यावरील संकटे कष्ट पासून रक्षण होते. तुपाचे दान केल्याने आपल्या कुटुंबासाठी शुभ आणि मंगलकारी असते. भूमीसंपन्न असाल तर पितृ पक्षात कुणी अतिशय गरीब व्यक्तीला भूमी दान करा,

परंतु ते शक्य नसेल तर एका परातीत मातीचे ढेकळे घेऊन ते दान करावे. या दिवशी धोतर उपरणे जे नवीन असतील त्याच्या दानाचे महत्त्व आहे. हे वस्त्र स्वच्छ नवीन सफेद असावीत. त्याने आपल्याला कशाचीही कमतरता असते.

चांदी दान केल्याने आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि संतुष्टीसाठी चांदीचे दान पुष्कळ प्रभावी मानले जाते. धान्य दान केल्यास देखील महत्वाचे ठरते. गहू, तांदूळ यांचे दान करावे. असे केल्याने इच्छा पूर्ण होतात. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि भांडण दरिद्रता दूर होण्यासाठी धान्य दान केले जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!