नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या घरातील वास्तू नेहमी आपल्याला तथास्तु बोलत असते,त्यामुळे वास्तूमध्ये बोलताना अतिशय सांभाळून बोलाले पाहिजे, कारण वास्तुपुरूष नेहमी तथास्तू म्हणत असतो,ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते,
लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत.
आपले घर हे घरातील सर्व सदस्य मिळून तयार झालेले असते.त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून-मिसळून राहतात. त्यामुळे घरातील सर्वांनाच सर्वांबद्दल सर्व गोष्टी माहिती असते, सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते.
परंतु घर म्हटले की, कधी कधी थोड्या-थोड्या गोष्टीवरून वाद-विवाद व भांडणात होत असतात.
काही वेळा घरातील लोकांची एकमेकांची मते पटत नाही,मग त्यामुळे परिणामी कधी कधी वाद विकोपाला जातात आणि एकमेकांना खूप वाईट आणि अपशब्द बोलले जाते.तसेच काही वेळा इतका प्रचंड राग आलेला असतो की ,
आपल्याच जवळच्या लोकांना आपण संतापाच्या भरात वाईट बोलून जातो, कधी-कधी त्या बोलण्यामध्ये वाईट हेतू नसतो.
आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे,हा त्रास हेच दुःखच्या भरात आपल्या तोंडातून काही अपशब्दद्वारे बाहेर पडत असते.याशिवाय आपण नकळतपणे कधी-कधी खूप भयंकर बोलून जातो आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचे अनेक बरबादीच्या तसेच वाईट गोष्टी बोलून जातो.
आपण सहज म्हणून जातो की, तुझं कधी चांगलं होणार नाही ,तुला कधीच सुख मिळणार नाही तसेच तू असाच मरशील आणि तुझे काम कधी सोडणार नाही, तो नेहमी पैसा-पैसा नको करू, पैसा आज आहे,
तर उद्या नाही.असा प्रकारे आपण एकमेकांना उणेदुणे अपशब्द बोलत असतो, परंतु आपल्याला घरातील या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करीत असतो आणि दिवसातून एकदा वेळा तथास्तु म्हणत असतो.
त्यामुळे आपण जर नेमके त्याच वेळी घरातील एखाद्या सदस्याला काहीतरी वाईट किंवा अपशब्द बोलत असलो, तर त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो.सारखे अपशब्द बोलले गेल्याने,
त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपणच बोललेल्या शब्दांचे वाईट परिणाम आपल्यासमोर येऊ लागतात. मग घरातील सदस्य आजारी पडू लागतात.
आर्थिक समस्या निर्माण होतात तसेच घरात दारिद्र्य निर्माण होते. समाजात आपला मान-सन्मान कमी होतो, कधीकधी घरांमध्ये वंशवाढ होत नाही.याशिवाय मुला-मुलींचे विवाह होत आहे
आणि प्रत्येक कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते. आपली परिस्थिती बिकट होऊन जाते.मग आपण विचार करतो की, सर्व गोष्टी आपल्याच बरोबर वाईट घडत आहेत.
तसेच कोणीतरी आपल्यावर करणी किंवा काळी जादू केली आहे,तसेच कोणाला तरी आपले चांगले झालेले सहन झाले नाही. मात्र या सर्वां अडचणीने मूळ कारण आपण स्वतः असतो.
कारण आपले वाईट बोलणे हे आपल्या लक्षात येत नाही,त्यामुळे आपण स्वतः च हे संकट स्वतःवर ओढवून घेतलेली असते. आपण जे मागतो ते बोलतो तेच सर्व काही आपल्याला मिळत असते.
आपल्या घरातील वास्तुपुरुष प्रसन्न मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात, परंतु त्यावेळी जर आपण अशुभ आणि वाईट बोलत असलो, तर आपल्याला तेच फलप्राप्ती होते.
त्यामुळे आपण जर घरात सर्वांशी चांगली वर्तणूक केल्यास, सर्वांना चांगलेच बोललो आपले व इतरांचेही भले व्हावे, हीच इच्छा केली व तेच सांगितले तर ,आपल्याला सुख व समृद्धी मिळते.
परंतु आपण कळत-नकळतपणे आपण ज्या काही चुका करतो, वाईट कर्मे करीत असतो, त्याचीच ही वाईट फळे आपल्याला सहन करावी लागतात,त्यामुळे आपण नेहमी घरात सर्वांचे चांगले व शुभ विचार केला पाहिजे.तसेच सकारात्मकच बोलल्याने,जे होईल ते चांगले शुभ आणि सकारात्मक होईल.
त्यामुळे आपल्याला नेहमी दुसऱ्या बद्दल चांगला विचार केला पाहिजे, तसेच सर्व प्रकारच्या वाईट बाबींचा आणि नकारात्मक गोष्टींचा जीवनात त्याग केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.