नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण आज असा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यामुळे जीवन सुरळीत होईल. हा उपाय आज करा, उद्या करा किंवा पितृपक्षात कधीही करा. पितर होतील खुश.
ज्या लोकांच्या डोक्यावर पितरांचे आशीर्वाद असतात , पूर्वजांचे शुभ आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असतात त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी ही नक्कीच निर्माण होते. पितृपक्षामध्ये आपण भूमातेची सेवा करून आपल्या पितरांना प्रसन्न करू शकता.
गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात, पितृदेव सुद्धा या गोमातेमध्ये वास्तव्य करतात आणि म्हणूनच त्या पक्षातील कोणत्याही दिवशी किंवा ज्यांना शक्य आहे.
त्यांनी दररोज किमान एक रोटी नक्की खाऊ घालावे. असे काही पदार्थ असे आहेत की जे गोमातेस खाऊ घातल्याने पितरांची विशेष कृपा प्राप्त होते. रोटी खाऊ घालताना किंवा हे विशेष पदार्थ गोमातेला खाऊ घालताना काही मंत्रांचा सुद्धा जप करू शकता
व गोमातेच्या कानात सुद्धा अनेक प्रकारच्या इच्छा बोलून दाखवता येतात. हिंदू धर्मशास्त्रात असेही मानतात की ज्या घरात गोमातेची सेवा केली जाते त्या घराच्या सात पिढ्या समृद्धी मध्ये जगतात . त्यांना संसारातील सर्व सुख प्राप्त होतात, पुण्याची प्राप्ती होते .
ज्यांना शक्य आहे त्यांनी या पितृपक्षात गोमातेला घरातील पहिली भाकरी किंवा चपाती खाऊ घालावी, कामातील अडथळे दूर होतात. प्रत्येक कामात यश मिळू लागतं, जर गोमाता बसलेल्या अवस्थेत असेल, खाली बसलेली असेल त्यावेळी जर रोटी आणि गुळ खाऊ घातला तर अतिउत्तम मानलं जातं.
त्यामुळे गोमाता प्रसन्न होते, पितृपक्षात मंगळवारच्या दिवशी रस्त्याने जाताना जर तुम्हाला एखाद्या गोमातेचे दर्शन झालं तर तिला हिरवा चारा असेल, रोटी भाकरी जे काही शक्य असेल ते मातेस नक्की खाऊ घाला. सुख-समृद्धी वैभव ऐश्वर्य हे जीवनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
जर तुम्ही एखादा व्रत करता, उपवास करत आहात तर त्या दिवशी या गोमातेची सेवा ही आत्यंतिक पुण्यदायी मानले जाते. ज्यांना आपली कार्य सफल करायचे आहे, कामामध्ये यश मिळवायचे आहे, तुमचा उद्योग धंदा आहे, व्यापार आहे,
कोणत्याही कामात यश प्राप्त करायच आहे, त्यांनी गोमातेची पूजा करून दररोज गोमातेची पूजा करावी किंवा विशेष तिथी असतात, एकादशी असेल, पौर्णिमा असेल अशा विशेष तिथींना गोमातेची पूजा कार्य संपन्न बनवते .
एक अत्यंत प्रभावशाली उपाय या पितृपक्षात तुम्ही करा, त्यासाठी बाजारातून काही केळी खरेदी करावी ,खरेदी करताना 5, 11, 21 या संख्येत खरेदी करा, ज्या लोकांच्या घरात पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही ,लक्ष्मी घरात नाहीये,
नशिबाची साथ मिळत नाही, भाग्य साथ देत नाहीये अशा वेळी आपण बाजारातून 5 /7 /9/ 11 किंवा विषम संख्येमध्ये केळी खरेदी करा आणि ही आणलेली केळी देवघरासमोर ठेवा.
सर्व देवी-देवतांना प्रार्थना करा कि आम्ही हे केळीचे फळ या ठिकाणी आपणासाठी देत आहे, ते कृपया स्वीकृत करा आणि आपली जी इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवा, आपली इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करा,
हे सर्व करत असताना एक दिवा मात्र त्याठिकाणी प्रज्वलित करण्यास विसरू नका आणि दिव्यामध्ये नक्की हळद टाका, दिवा तुपाचा असेल अतिउत्तम आहे , नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा आपण लावू शकता ,
आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या सर्वच्या सर्व केळी आपल्या घरातील सर्व लोकांच्या डोक्यावरून सात वेळा उलट्या दिशेने आपण वारायच्या आहेत, आपल्या घरातील सर्वांच्या डोक्यावर सात वेळा ही केळी वारायची आहे, ती वारत असताना
ओम गोपालाय नमः , ओम गोपालाय नमः या मंत्राचा सातत्याने जप करा आणि त्यानंतर या केळी आपण कोणत्याही मातेचे एकापेक्षा जास्त गाईंना खाऊ घातली तरीही चालेल , ज्या देवी-देवतांना प्रार्थना केली की आम्ही आपल्यासाठी फळ आणलेल आहे , गोमाते मध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात, हे फळ हे या सर्व देवी-देवतांच्या स्वरूपात आपण अर्पण करत असतो.
गोमातेस खाऊ घातल्यानंतर गोमातेच्या कानात ओम श्री ओम सूर्याय नमः , ओम श्री ओम सूर्याय नमः हा महालक्ष्मीचा महामंत्र आहे, हा मंत्र आपण नक्की बोला, सोबतच आपण आपली इच्छा सुद्धा गोमातेच्या कानात बोलू शकता, आपल्या गावाचे , आपल्या शहराच्या आसपास काही गोशाळा असतील , गोशाळा मध्ये ज्या ठिकाणी गाईंची सेवा केली जाते व मातेची सेवा होते त्या ठिकाणी आपण ही सेवा केल्यास या पितृपक्षांमध्ये पुण्याची प्राप्ती होते. जीवनातील मोठ्या मोठ्या समस्या दूर होतात.
तुमची मुलं ऐकत नसतील , घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, कोणतीही व्यक्ती तुमचं ऐकून घेत नाहीये तर अशा वेळी अजून एक उपाय आपण या पितृपक्षातील शनिवारी करू शकता.
जर तुम्हाला नोकरी मिळत नाहीये, काम मिळत नाही , एखादा आजारपण आहे, घरामध्ये एखादा रोग सातत्याने एक मोठी समस्या आहे, तरी या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी आपण पितृपक्षातील शनिवारी एक रोटी बनवा, एक भाकरी किंवा चपाती बनवा, पहिली रोटी अथवा चपाती बनवताना एकाच बाजूने भाजावी, ही भाजल्यानंतर ज्या ठिकाणी न भाजलेली बाजू आहे त्या ठिकाणी थोडसं मोहरीचे तेल लावायच आहे.
त्यानंतर ज्या व्यक्तीला समस्या आहे , जी व्यक्ती आजारी आहे ज्याला नोकरी मिळत नाहीये किंवा एखादी व्यक्ती ऐकत नाही त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावरून आपण ही रोटी सात वेळा वारायची आहे, उलट्या दिशेने उतरवायचे आहे, डोक्यावरून ते पूर्ण अंगावर वारावी, शनिदेवांचा शनि महाराजांचा मंत्र आहे जो तुम्ही रोटी वारताना म्हणा, ओम शन शनेश्वराय नमः , ओम शन शनेश्वराय नमः ,
सातवेळा ही रोटी उतरवायची आहे
डोक्यावरून, हा मंत्र म्हणत आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून शनिदेवांना प्रार्थना करायची आहे, जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची, यानंतर केव्हाही चपाती गोमातेच्या चरणी अर्पण करवी.
मातेच्या चरणी तिच्या पायाजवळ ठेवायचे आहे , गोमाता रोटी खाईल किंवा खाणार नाही, त्याकडे आपण लक्ष न देता परत वळून आपल्या घरी यायचा आहे, परतून पाठीमागे पाहू नका ,तुम्हाला परिणाम नक्की जाणवेल.
गोमातेच्या संबंधी या पितृपक्षात करावयाच अजून एक विशेष काम आहे, विशेष कार्य आहे, विशेष कार्य करताना आपण 11 रुपये, 21 रुपये, 100 रुपये गोमातेच्या नावाने बाजूला काढून ठेवा, ते पैसे हातात घेऊन आपली इच्छा बोला आणि आपण जे काही कार्य आहे ते कार्य करण्यासाठी आपण निघून जा.
कार्य करण्यापूर्वी या अकरा /एकवीस किंवा शंभर रुपयांच एखादं फळ खरेदी करा, कोणतेही फळ असेल किंवा गोमातेसाठी थोडासा चारा खरेदी करा आणि तिला खाऊ घाला , सेवा करा, त्याचे आशीर्वाद घ्या, प्रार्थना करा , हात जोडून की आम्ही अशा विशेष कार्यासाठी जात आहोत, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा ,अशा प्रकारची प्रार्थना करा आणि कामासाठी निघून जा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.