नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणेश चतुर्थी पासुन अनंत चतुर्दशी पर्यंत करा ही प्रभावी सेवा, सगळ्या ईच्छा पुर्ण नक्की होणार..
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणपती बाप्पांचा आपल्या घरात आगमन होत असतं. यालाच गणेश उत्सवाचा प्रारंभ किंवा श्री गणेश चतुर्थी या असे म्हणतात.
कारण श्री गणपती बाप्पा आपल्या घरात येतात सुख घेऊन येत असतात,मग अशा वेळी आपण श्री गणेशांना प्रसन्न करणारे काही छोटे-छोटे उपाय केल्यास ,संपूर्ण वर्षभर आपल्या घरात रिद्धी-सिद्धी तसे सुख वैभव आणि संपन्न निर्माण होईतो.
त्यामुळे आपल्याला श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच जेव्हा गणपती बाप्पा आपला निरोप घेतील,तोपर्यंत या 10 ते 11 दिवसांच्या कालावधीत एक उपाय करायचा आहे.
हा श्री गणेश चतुर्थीच्या कालावधीत हा उपाय केल्यास,आपल्या संपूर्ण घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासनार नाही, तसेच ज्या काही पैशांच्या समस्या असतील, त्या दुर होतील. तुमच्या घरातील गरिबी,दरिद्रता नष्ट होईल.तसेच याशिवाय आर्थिक समस्या,
घरातील दुःख आणि कष्ट,आजारपण या सर्व अडचणीपासून मुक्ती मिळण्यासाठी हा उपाय श्री गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत छोटासा उपाय नक्की केला पाहिजे.
हा उपायासाठी आपल्याला त्यासाठी शिवलिंगाची नितांत आवश्यकता आहे.त्यामुळे आसपासच्या कोणत्याही शिवमंदिर जावू शकता किंवा शिवमंदिरात जाणं शक्य नसेल, तर आपल्याच घरात जे शिवलिंग आहे,
आपल्या घरात शिवलिंग म्हणजेच भगवान शिव शंकराची महादेवाच्या पिंडीवर्ती आपल्याला हा उपाय करायचा आहे.
कारण गणेश पुराणानुसार,जी व्यक्ती मनोभावे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करते, तिच्या घरात रिद्धी-सिद्धी पाणी भरतात,तसेच वैभव,मान, पद-प्रतिष्ठा प्राप्त होते.त्यामुळे या शिवलिंगावर हा उपाय नक्कीच केला पाहिजे.
या उपायासाठी आपल्याला काही शमीपत्त्राची आवश्यकता लागणार आहे. शमीपत्र म्हणजे शमी या झाडाची पानं होय. हे शमीची पानं घेऊन ,त्यातील पाच पाने आपल्याला मनोभावे या शिवलिंगावर अर्पण करायची आहे.
कारण शिव पुराणानुसार, शिवलिंगामध्ये संपूर्ण शिव परिवार समाहित असतो. या शिवलिंगामध्ये संपूर्ण शिव परिवार म्हणजे, भगवान शिवशंकर ,माता पार्वती, भगवान श्रीगणेश,
जय भगवान शिव शंकरांनी माता-पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय तसेच भगवान शिव-शंभूंच्या या पाच कन्या आणि सर्वात छोटी कन्या म्हणजेच अशोक सुंदरी असा हा संपूर्ण शिवपरिवार यामध्ये असतो.
याशिवाय विष्णू तत्त्व आणि ब्रह्म तत्व म्हणजेच भगवान श्री विष्णु आणि या सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव हे सुद्धा शिवलिंगामध्ये समाहित असतात.
मग आपल्याला या शिवलिंगावरती थोडंस जल अर्पण करायचे आहे आणि ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जप करायचा आहे. पाच शमी पत्रे, पाच शमीची पाने ज्या ठिकाणी शिवलिंगावरती भगवान श्रीगणेशांचे स्थान आहे, त्या ठिकाणी मनोभावे अर्पण करायचे आहे.
पाच शमीपत्र आपण भगवान श्री गणेशाचे स्थान आहे, त्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत.मग त्यानंतर ती अर्पण केल्यानंतर 3 शमीपत्रे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत.
हे 5 शमीपत्र भगवान श्री गणेश वास करतात, त्या ठिकाणी तसेच 3 शमीपत्र ज्या ठिकाणी शिवलिंगाचा सर्वात वरचा भाग म्हणजे निमुळता वरचे टोक असते, त्या ठिकाणी अर्पण करायचे आहे.
मग त्यानंतर एक शमीपत्र हे ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग ठेवलेला आहे,जर ते नसेल, तर ज्या भगवान महादेवांचे मंदीर आपण हा उपाय करीत आहोत,त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजुला मंदिराचा दरवाजाच्या डावीकडे एक शमीपत्र ठेवायचे आहे.
आपण मंदिरातून पाहील्यास ,डावीकडे तर तुम्ही मंदिराच्या समोर बसून पूजा करत आहात तर तुमच्या उजव्या बाजूला किंवा तुमच्या देवघरात समोर बसून पूजा करत असाल, तर तुमच्या उजव्या बाजूला तुम्ही एक शमीपत्र समर्पित करायचा आहे.
मग ते शमीपत्र समर्पित केल्यानंतर, त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच बाजूला एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे. हे शमीपत्र समर्पित करताना तुम्हाला आणि तो तुपाचा दिवा लावताना,
भगवान श्री गणेशाचे नामस्मरण सातत्याने करायचे आहे किंवा “गण गणपतये नमः,’ ओम गं गणपतये नमः,” ओम गं गणपतये नमः, या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे.
जर तुमच्या परिसरात मंदिरे उघडलेली असतील किंवा तुमच्या गावांमध्ये परिसरात एखादं छोटसं शिवमंदिरात जावून,त्या मंदिराची छानची साफसफाई करावी आणि त्या ठिकाणी हा उपाय केल्यास,
परिणाम अधिक जलद गतीने दिसुन येईल. तिथे शिवलिंगाला व्यवस्थित साफ करून, स्वच्छ धुऊन घ्या आणि 5 शमीपत्र भगवान श्रीगणेशांना आणि 3 शमीपत्र हे शिवलिंगावर शिवलिंगाच्या टोकावरचे अर्पण करावे.
त्या छोट्याशा मंदिराच्या चौकटीत जातांना तुमच्या उजवीकडे आणि तुम्ही मंदिरातून जर बाहेर येत असतांना,त्यावेळी तुमच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी एक शमीपत्र समर्पित करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.
त्या शमीपत्र शेजारी एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा.तसेच मनोभावे प्रार्थना करावी की, आपल्या घरात सर्व प्रकारची दुःख,कष्ट, आजारपण दूर होऊन, धन,वैभव तसेच सुख-संपदा, आरोग्य या गोष्टींची प्राप्त होऊ दे. यामुळे रिद्धी-सिद्धी, वैभव मान-प्रतिष्ठा संपूर्ण वर्षभर कमी पडणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.