नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हरतालिका हे व्रत हा दिवस विवाहित महिलांचा खूप मोठा दिवस असतो. महिलांचा अत्यंत आवडीचा दिवस तसेच व्रतातील सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. विवाहित महिला सुख-समृद्धीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत करतात,
पूजा करत असतात आणि कुमारिका मुली सुद्धा या दिवशी व्रत करतात आणि पूजा सुद्धा करतात जेणेकरून त्यांना चांगला वर मिळावा. महिलांनी फक्त विवाहित महिलांनी या दिवशी संध्याकाळी बोलावा उमा पार्वतीचा मंत्र .
पार्वतीच्या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील . घरात सुख समृद्धी नांदेल आणि पतीचे आयुष्य वाढेल, कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केली जाते.
त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिका तृतीया असते. यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात.
देशातील अनेक राज्यांत हरितालिका व्रत विविध पद्धतीने साजरे केले जाते. यावर्षी 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका तृतीया साजरी केली जाणार आहे. हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात.
कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा.
पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात
आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत पारण केले जाते.
याच दिवशी रात्री या मंत्राचा महिलांनी 108 वेळेस म्हणजे एक माळ जप करायचा आहे. देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून प्रार्थना करावी.
सुख-समृद्धीसाठी ही पूजा मनोभावे करावी आणि त्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे. विवाहित महिलांनी विशेष करून हा जो मंत्र आहे त्याचा जयघोष करा जप करा,
देहि सौभाग्यं आरोग्यं देहि में परमं सुखम्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि॥ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः। मनुष्यों मत्प्रसादेन भवष्यति न संशय ॥
इतर सर्व महिलांनी हा मंत्र जप करा. ओम उमामहेश्वराय नमः , ओम उमामहेश्वराय नमः हरतालिकाचा दिवस हा पार्वतीचा आणि महादेवाचा दिवस मानला जातो. पार्वतीने महादेवासाठी या दिवशी व्रत केले होते.
म्हणून आपल्याला पार्वती मातेचे सुद्धा स्मरण करायचं आहे आणि महादेवाच सुद्धा स्मरण करायचे आहे, म्हणून उमामहेश्वराय नमः या मंत्राचा जप विवाहित महिलांनी करायचा.
त्यांना याचा लाभ नक्की होईल, मनोभावाने , पूर्ण श्रद्धा ठेवून आणि विश्वासाने जप करा , तुम्हाला त्या मंत्राचा लाभच होईल. यामुळे आपल्या घरावर कोणतेच संकट येणार नाही.
पुराणांमध्ये सांगितलेल्या कथेनुसार पार्वती देवीच्या मैत्रिणीने त्यांच्या वडिलांपासून देवी पार्वतीचे हरण करून घनघोर अरण्यात त्यांना घेऊन गेली होती आणि मैत्रिणी किंवा सखी म्हणजे अलिका घेऊन गेली व तेथे या व्रताची सुरुवात झाली म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले.
हे व्रत करण्यासाठी बारीक वाळूची पाटावर छोटीशी पिंड तयार करावी, बाजूला वाळूची देवी पार्वतीची स्थापना करावी. पूजेसाठी बेलाची पाने , शमीची पाने, केळीची पाने, धोत्र्याचे फुल व फळ तसेच आंब्याचे पान , अशोकाचे पान , विड्याची पाने या सर्वांची आवश्यकता असते.
देवी पार्वतीला बांगड्या , ब्लाउज पीस, हळद कुंकू सौभाग्याच या वस्तू अर्पण कराव्यात. थोडीशी फळे व फुले हे सर्व साहित्य घेऊन देवांचे देव महादेव आणि पार्वतीचे यथासांग पूजन करावे.
सर्वप्रथम देवी पार्वतीने भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार कराव्यात आणि त्यांना फुलांनी सजवावे . यावरती शिवलिंग बनवावे चौरंगावर पिवळे कापड घ्यावे, पूजेची तयारी करावी या कापडावर वाळूचे शिवलिंग ठेवावे,
त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्ट कमल तयार करावे आणि त्यावर कलश ठेवावा. कलशावर स्वस्तिक बनवावे , कलशात शुद्ध पाणी भरून त्यात सुपारी- नाणे टाकावे. लिंगाचा विधिवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू घालाव्यात, मेहंदी काढावी,
या दिवशी विशेष महत्त्व मानले जाते, या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी लावतात, ती सौभाग्याची निशाणी मानली जाते, प्रार्थना करावी की अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.
दिवसभर कडक उपवास करावा, शक्य नसल्यास फलाहार घ्यावा, तोच नैवेद्य दाखवावा. शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा, मग कथा ऐकूण आरती करावी , हरतालिका व्रताची कथा तुम्ही नक्की ऐकावी त्याचे पुण्य मिळते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.