नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थाय नमः , भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज.
चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.
चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले.
संकटांचा काळ हा आपली कठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भिऊ नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत , आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते.
स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत रहा, प्रयत्न सोडू नकोस, निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठिशी आहे, तू पडलास तर तुला हात देईन,
तू प्रयत्न करशील तर यश देईन. स्वामींची निरंतर सेवा करायला सर्वांनाच आवडते पण सध्याच्या धावत्या जगात आपण या गोष्टी करण्यासाठी वेळ नाही असे म्हणतो.
पण असं म्हणलं तर आपला वेळ हा जातच असतो, सेवा मात्र राहून जाते. त्यासाठी आपण हे एक काम नक्कीच करू शकता. स्वामींचे चिंतन कुठेही, कधीही आपण करू शकतो पण सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ थोडा हा काढवाच लागेल.
श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र असून सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. प्रत्येकाने दररोज या मंत्राचा 11 मिनिटे जप करावा. याला वयाची अट नाही.
स्वामींची महती भरपूर आहे. स्वामींची सेवा ही केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. काही लोकांच्या घरी नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, त्यांच्या घरी शांत वाटते, समाधानी वाटते.
तर याउलट काही लोक तक्रार करतात, वाद घालतात, सतत त्वेष करतात व घरातील शांती भंग पावते. अशा घरी अलक्ष्मी वास करते व घरातील सर्व सदस्य नाराज होतात वास्तुदोष तसेच नकारात्मकता वाढते.
जर तुम्ही हा उपाय तुमच्या घराच्या सुखासाठी कराल तर घरातील अशी नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल बऱ्याचदा आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही, वाईट स्वप्न पडतात, सतत कोणता ना कोणता त्रास असतो.
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मनोभावे केल्यास त्याचे अनेक फायदे अनुभव येतातच. सर्व दुःख निवारण होते. ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात. आपले रक्षण करतात व त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे भय व संकट येत नाही.
स्वामींवर अटल विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या आधार वडाची प्रचिती आजही भक्तांना येते.
म्हणून मित्रांनो या कठीण या वाईट काळात कठीण वेळ आपल्यावर समाजावर या जगावर आलेली आहे. त्या वेळेवर त्या संकटावर मात करण्यासाठी एकच शक्ती आहे.
श्री स्वामी समर्थांचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र हे नाम खूप शक्तिशाली आहे. याचा जप दररोज करा. माळ असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही.
मुखात नाम ठेवा काम करताना उठता-बसता चालताना कुठेही असाल मुखात तेथे श्री स्वामी समर्थ मंत्र मुखात ठेवा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर 11 मिनिटे रोज काढा
दिवसातून तुम्ही कधीही 11 मिनिटे वेळ काढून मंत्राचा जप मनोभावाने करू शकता आणि हा जप करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल.
संकट तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. तसेच 1 नारळ घेऊन या व पूर्ण शुद्ध मनाने देवघरासमोर बसावे. देवाचे सतत नाम घ्या..
तो नारळ देवघरात ठेवा व त्यावरती हात ठेवून तुमची अडचण असेल इच्छा जी कोणती आहे ती बोला त्यानंतर हात जोडून तुमच्या देवाचं स्मरण करा.
नंतर तो नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा ते शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात ठेऊन या.या दिवशी तो नारळ देवघरात ठेवा.
दुसऱ्या दिवशी त्याच मंदिरात अथवा नदीत विसर्जन करा. स्वामी तुमच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.