नशीब साथ देत नसेल, लिंबाचे 2 तुकडे इथे फेका, अचानक धनलाभ होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणेशपुराणानुसार गणेश चतुर्थी व्रतकथा सांगितली जाते. सत्राजित नावाचा एक यादव होता . त्याने तपश्चर्या करून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतले. सूर्यदेवाने त्याला स्यमंतक मणी प्रदान केला.

तो मनी प्रत्येक दिवशी आठ भार सुवर्ण देत असे , एकदा तो मणी गळ्यात घालून सत्राजित यादवांच्या सभेत गेला, मणी पाहून नारदमुनी म्हणाले, हा मणी कृष्णाच्या गळ्यात शोभुन दिसेल,

यावर सत्राजित म्हणाला हा मणी मी जपतप करून सूर्य देवाकडून मिळविला आहे, गोकुळच्या चोराला मी तो देणार नाही ! असा कृष्णाचा अपमान करून तो निघून केला. सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो मणी गळ्यात घातला

आणि शिकारीला निघून गेला, तेव्हा सिंहाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारले व तो मणी सिंह तोंडात धरून मेला . वृक्षांचा प्रमुख जांबुवंत याने तो मणी घेतला आणि मुलीच्या पाळण्याला बांधला.

मणी गळ्यात घालून गेलेला प्रसेन घरी परत आला नाही म्हणून सत्राजित दुःखीकष्टी बनला. प्रसेनचा घात करून कृष्णानेच तो मणी चोरला असावा असे लोक बोलू लागले,

यादव यांना बरोबर घेऊन प्रसेनचा शोध घेत अरण्यात गेला, त्याने प्रसेन आणि सिंह मरून पडलेले पहिले. तिथून अस्वलाच्या पाऊलखुणांचा माग काढीत तो एका गुहेपाशी आला,

यादव वीरांना बाहेर ठेवून कृष्ण धाडसाने गुहेत शिरला , पाळण्याला बांधलेला तो मणी कृष्ण काढून घेणार इतक्यात जांबुवंत धावून आला, दोघांचे मल्लयुद्ध झाले, कृष्ण व जांबुवंत यांचे 28 दिवस युद्ध चालले होते.

यादव वीर कृष्णाची वाट पाहून द्वारकेत परत गेले, कृष्ण आला नाही म्हणून नंद आणि यशोदा शोक करु लागले. इतक्यात आकाशवाणी झाली की चतुर्थीचे व्रत करा , कृष्ण परत येईल,

नंद-यशोदा यांनी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने केले आणि गणेश कृपेने कृष्णा द्वारकेला परत आला. जांबुवंत याने आपली कन्या जांबुवंती कृष्णाला अर्पण केली व तो मणी आंदण म्हणून दिला आणि पुष्कळ वैभव दिले.

कृष्णाने सत्राजिताला तो मणी देऊन आपल्यावर आलेला खोटा आळ दूर केला. सत्राजिताने आपली शूर सुंदर कन्या सत्यभामा कृष्णाला दिली आणि तो मणी सुद्धा देऊ लागला, परंतु कृष्णाने तो घेतला नाही.

वरद चतुर्थीच्या दिवशी गोरक्षरात साचलेल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले म्हणून कृष्णावर हा चोरीचा आळ आला होता, पण तो गणेश कृपा प्रसादाने फोल ठरला. शंबरासूर नाशासाठी कृष्णाने देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत केलं होतं,

एकदा कृष्ण धर्मराजास म्हणाले कृतवीर नावाचा एक राजा होता , त्याला पुत्रसंतान नव्हते तेव्हा त्याचा पिता ब्रम्हलोकी जाऊन तो ब्रह्मदेवास म्हणाला माझ्या पुत्रास एक पुत्र दे, माझे आपल्या चरणी मागण आहे.

यावर ब्रम्हदेव म्हणाले संकष्ट चतुर्थी व्रत करण्यास सांग हे व्रत केल्याने गणपती प्रसन्न होऊन त्यांना सद्गुणी पुत्र देईल,

कोणत्याही महिन्याची वद्य चतुर्दशी येते तीच संकष्ट चतुर्थी , या दिवशी उपोषण करावे , गणपतीचे पूजन करावे, चंद्रदर्शन घेऊन पारणे करावे , या व्रताने त्यांना इच्छित संतान प्राप्ती होईल. इच्छित सर्व काही लाभेल.

ब्रह्मदेवाच्या या उपदेशाने त्याने आपल्या मुलास संकष्टी चतुर्थी व्रत करण्यास सांगितले, या दोघा पती-पत्नींनी हे व्रता आचरण केले, गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली, असे प्रभावी व्रत आहे.

संकष्ट चतुर्थी हे व्रत केल्याने गणेशाची कृपा होते . विद्या ,मानसन्मान, ऐश्वर्य , वैभव यांचा लाभ होईल. जर कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या उशी खाली लिंबू ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उभे 2 काप करा.

नंतर ते तुम्ही उतरवून तीन टिकत वरती फेकून या. मग पाहा चमत्कार. तसेच उद्या आजारी व्यक्तीने गणपती स्तोत्र जास्तीत जास्ती वेळेस बोला .

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!