राखी पौर्णिमेला घराच्या मध्यावर जाळा या वस्तू, कर्ज मुक्ती, संकट, गरिबी चुटकित दूर होणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, यावर्षी रक्षाबंधन काही ठिकाणी 30 ऑगस्टला तर काही ठिकाणी 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जात आहे. 30 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता भद्रा काळ संपत आहे, त्यामुळे हा सण 31 ऑगस्टला शुभ मुहूर्तावर साजरा केला जाऊ शकतो.

ज्योतिषशास्त्रात रक्षाबंधनाच्या दिवशी करावयाचे काही खास उपाय गरिबी दूर करण्यासाठी सांगितले आहेत. हे उपाय केल्याने जीवनात शुभ आणि मान-सन्मान वाढतो आणि भाऊ-बहिणीचे नातेही घट्ट होते. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस.

लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण हा दिवस म्हणजे त्यांच्या हक्काचा सुट्टीचा दिवस असतो. बहीण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधायला येते तेव्हा ती एका ताटात कुंकू, तांदूळ ,नारळ ,राखी, मिठाई ,दिवा व पाण्याने भरलेला कलश असे संपूर्ण सजवते.

भावाचे पूजन करून राखी बांधतांना या सात वस्तू पूजेच्या ताटात असणे अनिवार्य आहे. पूजेच्या ताटात या सात वस्तू ठेवण्याचे विषेश महत्त्व आहे. बहिण-भावाला सर्वात आधी कुंकवाचा टिळा लावते , कुंकू सूर्यग्रहणाशी संबांधीत आहे,

कुंकवाचा टिळा लावल्याने भावावर सुर्यदेवांची दृष्टी पडते, बहिण भावासाठी सूर्य देवांकडे प्रार्थना करते, येणाऱ्या वर्षात आपल्या भावाला सर्व प्रकारचे यश व प्रसिद्धी मिळावी
यासाठी प्रार्थना करते.

दुसरी वस्तू आहे तांदूळ आणि अक्षता , कोणत्याही पूजेत तांदळाला सर्वात शुभ मानले जाते आणि तांदळा शिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. परिणामी भावाला कुंकू लावून त्यावर अक्षता लावते, हे शुक्र ग्रहाचे संबंधित आहे

व अशी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारची शुद्धता व पवित्रता यावी आणि माझे व माझ्या भावाचे संबंध नेहमी स्नेहपूर्ण राहावेत. यानंतर आहे नारळ , नारळाला श्रीफळ म्हटले जाते,

बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळत राहो व त्याचे जीवन आरामदायक व आनंदी असो.

नंतर आहे राखी किंवा रक्षासूत्र, राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते, हे मंगळ ग्रहाचे संबंधित आहे. भावाच्या सुरक्षेसाठी ही बहिणीची प्रार्थना असते.
मिठाई, बहीण राखी बांधून झाली की त्याचे तोंड गोड करते.

मिठाई गुरू ग्रहाशी संबंधित आहे आणि त्याद्वारे ही प्रार्थना केली जाते माझ्या भावावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहावी व आपल्या भावाचे मुले-मुली व वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहावेत.

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हा सण पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो आणि पौर्णिमा देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी भाऊ आणि बहिणी भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा करतात आणि संध्याकाळी दूध आणि अक्षत पाण्यात मिसळून चंद्राला अर्घ्य देतात.

असे केल्याने ग्रहांचे शुभ प्रभाव प्राप्त होतील आणि जीवनात प्रगतीचा मार्ग निघेल.गरिबी दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातातून गुलाबी कपड्यात तांदूळ, एक रुपया आणि एक सुपारी बांधावी.

यानंतर बहीण भावाला राखी बांधते आणि नंतर भावाला कपडे, पांढरी मिठाई आणि पैसे देऊन पाय स्पर्श करते. त्यानंतर गुलाबी कपड्यात ठेवलेल्या वस्तू उत्तर दिशेला ठेवाव्यात.

असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.बहिणी भावाला राखी बांधतात तेव्हा पूजेच्या ताटात तुरटी टाकतात. राखी बांधल्यानंतर भावाच्या डोक्यापासून पायापर्यंत विरुद्ध दिशेने तुरटीचा सात वेळा प्रहार करा

आणि चौरस्त्याच्या किंवा चुलीच्या आगीत टाका, असे केल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि सभोवताली सकारात्मक ऊर्जा संचारते. तुरटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगाचे मातीचे भांडे लाल कपड्याने झाकून त्यावर नारळ ठेवावा आणि मग राखी बांधल्यानंतर या भांड्याला पिशवी बनवून वाहत्या पाण्यात वाहू द्या. तेव्हा बंधू-भगिनींनी मिळून गणेशाची पूजा करावी.

असे केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि भावा-बहिणींमध्ये प्रेम टिकून राहते. यासोबतच घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही आणि गणेशाच्या आशीर्वादाने नोकरी, व्यवसायात प्रगती होते.

रक्षाबंधनाच्या दिवशी बंधू-भगिनींनी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे आणि गायीला हिरवा चारा खायला द्यावा. तुम्ही गोशाळेत गायींच्या सेवेसाठी पैसेही देऊ शकता. असे केल्याने 33 कोटी देवतांची कृपा होते

आणि घरात सुख-समृद्धी राहते.रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहिणी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात आणि एकत्र देवी लक्ष्मीची पूजा करतात. यासोबत केशराची खीर अर्पण करावी.

यानंतर माता लक्ष्मीसमोर बहिणी आणि भावांना राखी बांधून कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर आठ मुलींना बोलावून खीर प्रसादाचे वाटप करा आणि लाल चुनरीसह दान करा.

असे केल्याने माँ लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग तयार होतो. या दिवशी तुम्ही भीमसेन कापूर 7 किंवा साध्या कापूर वड्या, थोडी पिवळी मोहरी, 2 इलायची, थोड तूप व 7 लवंग जाळा. श्री सुक्त म्हणा. माता लक्ष्मीची सेवा मंत्र जप करा. भावाच औक्षण करताना शास्त्रीय पद्धतीने करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!