नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याकडे दरिद्रता येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरातून लवकरात लवकर या वस्तू काढून टाका. यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. वास्तुशास्त्रानुसार काही अशा वस्तू आहेत घरात ठेवल्यास आर्थिक नुकसान तर होतेच त्याशिवाय कामात अडथळे आणि बाधा निर्माण होतात.
परंतु त्या घरातल्या वस्तू असतात तेव्हा भगवंत कधीही आपली कृपा करीत नाहीत आणि घरात नेहमी अडचण आणि दरिद्रता राहते. जोडलेले किंवा मोडलेले मोडलेल्या मोडकळीस आलेल्या देव मूर्ती कधीही ठेवू नयेत असेही सांगितले गेले आहे
ज्या व्यक्ती आपल्या घराचे काळजी घेतात प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ अशा घरात देवी लक्ष्मी नित्य वास करते आणि असे म्हटले जाते की आपल्या घराची काळजी न घेणाऱ्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही म्हणून स्वच्छता करावी आणि काळजी घ्यावी.
दुसरे म्हणजे कोळ्याचे जाळे. आपण जर मोठ्या घरांमध्ये श्रीमंतांकडे गेलो तर त्यांच्या घरी सगळीकडे स्वच्छता आणि टापटीप दिसते . घरात कोळ्याचे जाळे असेल तर आपले प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात. त्या संबंधात दुरावा निर्माण होतो.
व्यवसाय ठप्प होतो. अपघात घडतात. असे काही ना काही अडथळे येत राहतात म्हणून आपल्या घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर लगेचच ते साफ करून घराणे व मनाने नवीन वर्षाचे स्वागत करा. तिसरी वस्तू म्हणजे फुटलेला आरसा.
काचेचे फुटणे एक अपशकुन समजला जातो. परंतु फुटलेला आरसा घरात ठेवणे त्यापेक्षा जास्त अशुभ मानले जाते. फुटलेला काच किंवा आरसा जास्त घरात राहिले तर वाईट शक्ती घरात येईल, ते वास्तव्य करतात.
फुटलेल्या काच किंवा आरसा असेल तर तो त्वरित फेकून द्यावा. कितीही महाग आरसा असेल किंवा शोपीस असेल तरीही तो फुटला तर लगेच कुणास द्यावा तरच वाईट शक्तींचे वास्तव्य वाढविण्यापेक्षा ते फेकून दिलेले कधीही चांगले.
चौथी गोष्ट म्हणजे बंद पडलेले घड्याळ. जर माणसाची वेळ चांगली सर्व काही चांगले म्हणून आपल्या घरात जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाका. कारण वास्तुशास्त्रानुसार जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर नकारात्मक ऊर्जा पसरते आणि संपूर्ण घर नकारात्मकतेने भरून जाते.
आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात. घड्याळ चालू असेल तर त्यातून शुभ ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर त्वरित चालू करावे किंवा टाकून द्यावे. त्याशिवाय घड्याळ कधीही मागेही नसावे आपण नेहमी मागेच राहतो.
एक तर घड्याळ असावे किंवा 2-5 मिनिटे पुढे असावे. पाचवी वस्तू म्हणजे भगवंतांच्या खंडित झालेल्या मुर्त्या फाटलेले फोटो यांचा आणि आपल्या घरावर दुष्परिणाम होतो म्हणून असे फोटो किंवा मुर्त्या लगेचच त्या पाण्यात विसर्जन करावेत.
त्याप्रमाणे जुने फाटलेले न वापरात असलेल्या कपडे जुने बंद पडलेले इलेक्ट्रिक सामान हे सर्व नवीन वर्ष तुम्ही घरातून बाहेर काढावे. मोडलेले फर्निचर जुन्या चपला-बूट भंगार सामान हे सर्व नवीन वर्षाची सुरुवात येण्याअगोदर घरा बाहेर काढावेत
आणि नव्या वर्षाची सुरुवात स्वच्छ व पवित्र वातावरण आणि प्रसन्न मनाने करावे. त्यापुढील म्हणजे बेडरूममधील तुटलेला किंवा करकर आवाज करणारा बेड. ते लगेच दुरुस्त करावे किंवा बदलावे नाहीतर परत जीवनावर त्याचा वाईट प्रभाव पडतो.
त्यांच्यात नेहमी भांडण करते छोट्या छोट्या गोष्टींचे मोठ्या भांडणात परिवर्तन होते याचे कारण काय आहे हे शोधून त्यावर उपाय करण्याऐवजी आपण इतर गोष्टींकडे लक्ष देत असतो म्हणून तुमचा बेड तुटला असेल त्यातून करकर आवाज येत असेल तर लगेच घराबाहेर काढले पाहिजे . फुटलेल्या तडा गेलेल्या फोटो फ्रेम ते आपल्या घरात ठेवू नयेत.
घरात नटराजाचे चित्र , बुडते जहाज , महाभारतातील युद्धाचे चित्र , जंगली पशु आणि काटेरी झुडपे यांची चित्रे घरात कधीच लावू नये. याने मनात नकारात्मक विचार निर्माण होतात .महाभारताच्या चित्रामुळे घरात भांडणे होतात , ताजमहाल ही एक कबर आहे.
बुडते जहाजाचे चित्र घरातील पैसा खर्च करते. तसेच जंगली जनावरांच्या चित्राने तुमचा स्वभाव ही तसाच बनतो आणि काटेरी झाडांच्या चित्राने जीवनात काटे निर्माण होतात.
घरातील काही वस्तूंमुळे फायदा होत आहे की तोटा हे समजत नसेल तर या वस्तू घरातून बाहेर काढायला हव्या. सध्या प्लास्टिकची फॅशन वाढत आहे. याने नकारात्मकता वाढते आणि आरोग्याला ते हानिकारक असते.
त्यामुळे या वस्तु घरातुन बाहेर काढा . घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर ते लगेच काढावेत नाही तर घर पुर्ण जाळीत फसते. अनेक लोकांना वाटते की ते जाळे तोडणे म्हणजे घर तोडणे.पण तसे नसून जाळे जळमटे वेळच्या वेळी काढा.
देवपूजा झाल्यावर घरात निर्माल्य ठेऊ नये कारण त्याने आपल्याला अशुभ फळे प्राप्त होतात. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्ही लिंबु-मिरची लावत असाल तर ते प्रत्येक आठवड्यात ते बदलत रहा.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर चुकूनही कचरा ठेवू नये. या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घराच्या छतावर कोणताही कचरा किंवा जुनी खराब वस्तू ठेवली असेल तर ती घराबाहेर फेकून द्या.
घराच्या छतावर जुना कचरा ठेवला असेल तर तो लगेच बाहेर काढा. घरात रद्दी आणि जुने कागद ठेवणे आई लक्ष्मीला आवडत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या घरात गरिबीही येऊ शकते. म्हणूनच जुनी कागदपत्रे किंवा मासिके गच्चीवर ठेवू नयेत.
घराच्या छतावर टाकाऊ झाडे, माती किंवा धूळ साचू देऊ नका. छतावर घाण साचू देऊ नका आणि नेहमी स्वच्छ ठेवा. वेळोवेळी छताची साफसफाई केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घराच्या छतावर झाडू, गंजलेले लोखंड किंवा निरुपयोगी लाकडाचे तुकडे कधीही ठेवू नका. या वस्तू छतावर ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.
कपडे सुकवण्यासाठी छताला दोरी बांधली तर ते बांधल्यानंतर दोरीचा गठ्ठा कधीही छतावर ठेवू नका. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. जर दुर्दैव तुमचा पाठलाग करत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अघटित घडत असेल तर वास्तूनुसार घराचे छत नेहमी पाण्याने धुत रहा.
छत नेहमी स्वच्छ ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. बाथरूम मधे तुटक्या फुटक्या वस्तू, खूप कागद, न वापरता असणारे कपडे खूप दुर्गंधी असणे अशा गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकट येऊ शकते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.