नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,सावन अधिक मासची पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीला मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते, तसेच कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. 18 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असून 16 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे.
सावनमध्ये अधिक महिन्यांचा संयोग 19 वर्षांनंतर तयार होतो, त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात. या महिन्यात सर्व प्रकारची शुभ कार्ये वर्ज्य आहेत.श्रावण अधिक शुक्ल पक्षाची पौर्णिमा 01 ऑगस्ट रोजी पहाटे 05.21 पासून सुरू होईल
आणि 02 ऑगस्ट रोजी पहाटे 01.31 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत मंगळवार, 01 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण अधिक पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार आहे.
पौर्णिमेचे महत्त्व, सनातन धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो. या दिवशी पाणी आणि वातावरणात एक विशेष ऊर्जा असते. या तिथीचा स्वामी चंद्र आहे. यासोबतच या दिवशी स्नान आणि दानाचेही विशेष महत्त्व आहे.
चंद्राची पूजा करा. भगवान विष्णूसोबतच 1 ऑगस्टला म्हणजेच सावन महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करा. यातून व्यक्तीला विशेष फळ मिळते. तसेच पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे माणसाला पुण्य फळ मिळते. अशा स्थितीत अधिक मासच्या पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. या दिवशी अन्न, पैसे, कपडे किंवा तांदूळ यासारख्या वस्तू गरजूंना दान कराव्यात.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. दुसरीकडे, जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर तुम्ही अधीक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी. या उपायाने पैशाच्या समस्या दूर होतात.
अधिक महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी आणि सायंकाळी धनलक्ष्मी देवीचे पूजन, आरती, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. धनलक्ष्मी पूजनात कमळ आणि गुलाबांच्या फुलांचा आवर्जुन वापर करावा.
तसेच नैवेद्यात लवंग अर्पण करावी आणि पूजनानंतर ग्रहण करावी. त्यातील एक लवंग पाकिटात ठेवावी. असा उपाय केल्याने कर्जमुक्ती जलदगतीने होऊ शकते. धनसंचय वृद्धिंगत होऊ शकतो.
बचतीच्या योजना यशस्वी होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनासह काही स्तोत्रांचे पठण अत्यंत उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
धनलक्ष्मी पूजनानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा कनक धारा स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जाते. शास्त्रांनुसार, या दोन्ही स्तोत्रांचे पठण केल्याने अनेकविध सिद्धी प्राप्त होऊ शकतात.
राजयोग जुळून येतात. तसेच विरोधक आणि हितशत्रू नामोहरम होतात. इंद्राने रचलेल्या या स्तोत्रांच्या पठणामुळे ऐश्वर्य आणि अपार धन-संपदा प्राप्त होऊ शकते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
अधिक महिन्यातील पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनानंतर काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त मानला जातो. पौर्णिमेच्या तिन्हीसांजेला निरशा दुधात साखर आणि तांदुळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण करावे.
यावेळी ‘ॐ स्रां स्रीं स्रौं स: चन्द्रमासे नम:’ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने धन-धान्य, धन-संपदा यांची कधीही कमतरता राहत नाही, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
तसेच या दिवशी अकरा कवड्यांना हळदीचा लेप लावून लक्ष्मी पूजनात ठेवावे आणि त्यांचेही पूजन करावे. पूजेनंतर कवड्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात सुरक्षित ठेवावे. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारणा घडून येते.
नकारात्मक ऊर्जा दूर होतो. सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते.पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना करण्यासह सुवासिनी महिलेला सौभाग्याच्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात.
सुवासिनी महिला मातास्वरुप मानल्या जातात. असे केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. भाग्याची भक्कम साथ मिळण्यास सुरुवात होते. लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. वैवाहिक जीवन सुखकारक होते, असे सांगितले जाते.
तसेच पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळाची स्थापना करावी. एकाक्षी नारळ महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच्या पूजनाने सौभाग्याची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.
व्यापार, व्यवसाय, उद्योग, नोकरी या क्षेत्रातील व्यक्तींना मानसिक तणावाला वारंवार सामोरे जावे लागत असल्यास अधिक महिन्याच्या पौर्णिमेला खिरीत केशर मिसळून त्याचा नैवेद्य लक्ष्मी देवीला अर्पण करावा.
यानंतर या खिरीचा प्रसाद कुटुंबातील ज्येष्ठ महिला आणि गरजूंना द्यावा. असे केल्याने मानसिक ताण-तणाव दूर होतो. व्यापार, व्यवसाय, उद्योग गतिमान होऊन वृद्धी-विस्तार होण्यास उपयुक्त संधी उपलब्ध होतात. सदर उपाय समृद्धी, ऐश्वर्य, वैभव कारक मानला गेल्याचे सांगितले गेले आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.