नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकटदिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले.
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.
स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.
आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.
स्वामी समर्थ महाराच यांचा प्रकट दिवस साजरा करण्यसाठी कोणतीही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही साध्य पद्धतीने स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. काही तरी संकल्प करून पूर्ण दिवस तो पाळावा किंवा वर्ष भर सुद्धा केला तरी चालेल.
एक दिवा पूर्ण दिवस आपल्या देवघरात लून ठेवावा, तो पूर्ण दिवस चालेल याची काळजी घ्यावी, त्यात वरोवर तेल टाकत रहावे जेणेकरून दिवा दिवस भर चालेल. आणि दिवस भर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. तसेच काही स्वामी भक्त एक दिवस स्वामी समर्थ महाराजनचे परायण करतात.
स्वामी समर्थ महाराजां एक गोष्ट सर्वात जास्त आवडते ती म्हणजे, स्वामींची भक्ती करताना कोणताही देखावा करूनका तसेच तम्ही केलेल्या सेवे बदल सगळीकडे सांगत बसुंका अशी गोष्ट स्वामींना आवडत नाही, स्वामींची सेवा करणारे भक्त कुठे पण गाजावाजा करत नाही,
स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणारे सेवक मनपासून व निष्ठेने सेवा करत असतात, ते कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही. आशा सेवकांना व भक्तांना स्वामी लगेच प्रसन्न होतात, व त्याची इच्छा पूर्ण करतात.श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस त्यानं यांचा आवडता नैवद्य दाखवावा,
त्याना पूर्ण पोळी व दूध हा नैवद्य दाखवला तर खुप चागले आहे. पण या सर्व गोष्टी झाल्याचं पाहिजे असे नाही, पाळी भाजी, भात वरण शुद्ध चालेल.
कोणतेही पद्रार्थ मनापसून तसेच भक्ती भावेने करावेत, स्वामींना भक्ती भावेने केलेल्या गोष्टी खुप आवडतात त्या कितीही सध्या असल्या तरी चालतात.
रोज संध्याकाळी तुम्ही स्वामींना दिवा धूप स्वामी सारामृत पारायण कराच. पण तुम्ही हे देखील लक्षात घ्या की मनापासून सेवा घडत आहे की नाही. सेवेचं मोल मिळते पण आपण तशी मन लावून करावी. स्वामींचे लक्ष असते. तसेच रोज अवदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. स्वामी नामाचा जप अखंड करावा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.