अधिक महिन्यात भगवान विष्णूंना असे शरण जा, जपा हा सोपा मंत्र, दारिद्र्य कायमचे पळून जाईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अधिक मासामुळे, 2023 मध्ये सणांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. परंतु सर्व प्रथम अधिक मासाची गणना कशी केली जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. पंचांगाच्या आधारावर, प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अधिक असतो, ज्याला अधिक मास म्हणतात.

एक सौर वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचे असते आणि चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते. सौर वर्ष आणि चंद्र वर्षातील फरक समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक चंद्र महिना जोडला जातो. याला मलमास म्हणतात. हिंदू धर्मात मलमास दरम्यान शुभ कार्ये निषिद्ध आहेत. 2023 मध्ये मालमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहे.

2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

सहसा श्रावण महिन्यात 4 किंवा 5 सोमवार येतात. पण 2023 मध्ये 8 श्रावण सोमवार केले जाईल. कारण पंचांगानुसार, सावन कृष्णपक्ष 4 ते 17 जुलैपर्यंत आहे आणि त्यानंतर 18 जुलैपासून लागू होईल.  तर, 16 ऑगस्ट रोजी मलमास अमावस्या असेल. या दिवशी अधिक मास समाप्त होईल. यानंतर, श्रावणचा शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 30 ऑगस्ट रोजी, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होईल.

अशाप्रकारे श्रावण महिन्यातील अतिरिक्त मासामुळे 8 सोमवार येणार आहेतजेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो.

म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो.”अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात.धोंड्याचा महिना आणि जावयाचा संबंध अधिक महिन्यात दानधर्म करावा, असं शास्त्रात सांगतात.

पण यथाशक्ती दान असावं आणि ते गुप्त असावं याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. “हिंदू संस्कृतीत गुप्त दानाला महत्त्व आहे. प्रतिष्ठेसाठी परंपरेच्या नावावर केलेलं दान शास्त्रात उल्लेखलेलं नाही. अनारशाचं वाण आणि दीपदान एवढंच अपेक्षित असतं.

जावयाला विष्णूचं स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे.”अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे अनेक घरांमध्ये करतात. महागड्या वस्तू, सोनं-नाणं जावई किंवा सासरच्या मंडळींना देण्याच्या प्रथेचे प्रस्थ अलिकडे वाढले आहे आणि ते अनिष्ट आहे, त्याऐवजी “आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान , अर्थदान, ग्रंथदान गरजू लोकांना करणे जास्त योग्य आहे,

” या महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत आहे. अधिकामांचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात.

या महिन्यात श्री कृष्ण, श्रीमद भागवत गीता, श्री राम कथा वाचन, गजेंद्र मोक्ष कथा आणि भगवान श्री विष्णूच्या श्री नृसिंह स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. या महिन्यात उपासनेचे स्वतःचे महत्त्व आहे. जो व्यक्ती या महिन्यात व्रत, उपासना, उपासना करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि वैकुंठाची प्राप्ती होते.

हिंदू पंचागानुसार अधिक महिना सुरू होणार आहे. या अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाचे पूजन करावे. घरात तुळशीचे झाड असल्यास त्याच्या जवळ सकाळी तुपाचा आणि संध्याकाळी तेलाचा तेवत दिवा ठेवावा.

अधिक महिना हा विष्णूचा महिना समजला जातो. विष्णू देवाला तुळस प्रिय असल्यामुळे तुळशीची दररोज पूजा करा. तुळशीची निगा राखा, तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घाला. तुळशीची वाढ ही घरात समृद्धी येत असल्याचे लक्षण समजतात. विष्णू आणि विष्णूचे रुप असलेल्या कृष्णाची अधिक महिन्यात पूजा करतात.

तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा ठेवून मनोभावे तुळशीला नमस्कार करावा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.भारतात बहुसंख्य घरांमध्ये तुळशीचे झाड हे असते. शक्यतो तुळशीचे झाड घराच्या दाराजवळ असावे. घरात येणाऱ्यांची नकारात्मकता दूर करुन तुळस घरात फक्त सकारात्मक ऊर्जेला प्रवेश देते.

अधिक महिन्यात विष्णू आणि विष्णूचे रुप असलेल्या कृष्णाची पूजा करावी तसेच दररोज सकाळी तुपाचा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा तुळशीसमोर ठेवून मनोभावे तुळशीला नमस्कार करावा. तुळशीची निगा राखावी. तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घालावे.

अधिक महिन्यात पाण्यात तुळशीचे पान घालून त्या पाण्याने आंघोळ करावी (स्नान करावे). तसेच आंघोळीनंतर काहीही खाण्याआधी तुळशीचे पान स्वच्छ धुतलेले पान चावून खावे. या नंतर घरात धार्मिक विधी करणार असल्यास ते मनोभावे करुन घ्यावे. अधिक महिन्यात तुळशी मंत्र, विष्णू मंत्र, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’चे पठण जास्तीत जास्त करावे.

दररोज तुळशी पूजन केल्याने घरातील साकात्मक ऊर्जा वाढते. घरातील मतभेद कमी होतात. दररोज तुळशी पूजन केल्याने कुटुंब प्रमुख तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पूजा करणाऱ्याने दही, तुळशीचे पान आणि साखर यांचे मिश्रण चावून खावे. देवाला प्रसाद दाखवून झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या प्रसादाचे तसेच दही, तुळशीचे पान आणि साखर यांच्या मिश्रणाचे वाटप करावे.

सर्वांनी दोन्ही प्रसादांचे मनोभावे सेवन करावे. प्रसादासाठी काही उपलब्ध नसल्यास किमान तुळशीचे पान प्रसाद म्हणून ठेवण्याची पद्धत आहे. तुळशीच्या पानांचे सेवन शांतपणे आणि मनोभावे करावे. पानाच्या रुपातून सर्व देवांचा आशीर्वाद लाभतो असे समजतात.ताणतणाव अथवा मानसिक समस्येचा सामना करत असल्यास दही आणि तुळशीचे पान यांचा प्रसाद दाखवून याचे सेवन करावे.

अधिक महिन्यात घरात तुळशीचे नवे झाड लावणे तसेच नातलगांना तुळशीचे रोप भेट देणे हे शुभ समजले जाते. तुळशीच्या पानाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, रक्त शुद्ध करते. तुळशीची स्वच्छ धुतलेली पाने आणि थोडे पाणी यांचे मिश्रण मिक्सरमध्ये मिक्स करुन लेप तयार करावा आणि तो जखमेवर लावावा, जखम लवकर बरी होते. फंगल इन्फेक्शन, अॅलर्जीमुळे खराब झालेली त्वचा, मुरुमाचे फो़ड अशा ठिकाणी तुळशीचा लेप लावावा.

औषधी गुण असलेली तुळस भारतीय संस्कृतीत महत्त्वाची आहे. आपण तुळशीचे महत्त्व ओळखा आणि अद्याप घरात तुळस लावली नसेल तर लगेच तुळशीचे झाड घरात लावा, त्याची निगा राखा आणि दररोज या झाडाचे पूजन करा. रोज सायंकाळी देवघरात व तुळशीत दिवा लावा आणि घरात धूप व लवंग फिरवा. तसेच विष्णू सहस्त्र नाम, विष्णू आणि लक्ष्मी गायत्री मंत्र बोला. यामुळे नक्कीच लाभ होतील व हळूहळू सकारात्मक बदल दिसून येतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!