चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतो हे संकेत, तुमची आता गरिबीतून कायमची सुटका होणार हे समजून जा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, माणसाच्या आयुष्यात जेव्हा कधी चांगली वेळ येणार असते तेव्हा देव नक्कीच संकेत देतो. चांगल्या काळाची चिन्हे असोत किंवा वाईट काळाची चिन्हे असोत, दोन्ही चिन्हे तुम्हाला आधीच मिळू लागतात. कधीकधी आपल्याला ही चिन्हे समजत नाहीत.

त्या गोष्टींची जाणीव नसल्यामुळे आयुष्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतात, पण निर्णय आणि अज्ञानामुळे त्या संधी आपल्या हातातून वाळूसारख्या निसटतात. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येत असतात.

मग ती व्यक्ती कोणीही का असे ना. यासाठी कारणीभूत असते ती वेळ, म्हणून तर लोक म्हणतात की थोडा वेळ द्या, सगळं काही ठिक होईल.अचानक आनंदी वाटू लागणं आयुष्यात काहीच होत नाही असं वाटत असताना,

अचानक एक दिवस मन प्रसन्न आणि आनंदी वाटणं. याचा अर्थ असा की नशीबाने तुमच्या आयुष्यात काही तरी चांगलं लिहिलं आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेनेच धनाची प्राप्ती होते. ज्योतिष शास्त्रानुसार अशी काही शुभ चिन्हे आहेत, जे सूचित करतात की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होईल आणि तुम्हाला अपार धन प्राप्त होईल. तुम्ही याला चांगल्या काळाचे लक्षण देखील मानू शकता.

जर अचानक तुमच्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्या आल्या आणि वर्तुळ बनवून काही खायला लागल्या तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मी येणार आहेत आणि तुम्हाला अपार संपत्ती मिळणार आहे. अशा वेळी त्या मुंग्यांना नमस्कार करून त्यांना साखर किंवा पीठ खायला द्यावे.

जर तुमच्या घरात चिमणी येऊन घरटे बनवत असेल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. हा संकेत आहे की आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. पण जर कावळा असेल तर अशुभ मानले जाते.

तसेंच जर वाटेत चालताना एखादे नाणे पडलेले दिसले तर ते उधारीचे पैसे लवकर मिळण्याचे लक्षण आहे, ते मजबूत आर्थिक स्थितीचे, धनलाभाचेही लक्षण आहे.

जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन पाल दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण आहे, असेही म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. हे भरपूर पैसे मिळण्याचे लक्षण आहे.

जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर हे देखील धनप्राप्तीचे शुभ लक्षण आहे. तसेच स्वप्नात झाडू, घुबड, घागरी, हत्ती, मुंगूस, शंख, सरडा, तारा, नाग, गुलाब इत्यादी दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे.

असे म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी आणि संध्याकाळीही ऐकू येत असेल, कानावर पडत असेल तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. तुम्ही घराबाहेर पडताना जर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे.

जर तुम्हाला खूप दिवसांपासून घराबाहेर माता लक्ष्मीचे वाहन घुबड दिसत असेल तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला लवकरच अपार संपत्ती मिळेल.

जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा रोटी आणताना दिसला तर ते सूचित करते की तुम्ही कुठून तरी पैसे कमवायला जात आहात. तुम्ही यशस्वी होणार आहात.

गायीचं येणं जर तुम्ही जेवताना गाय आली किंवा गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हे शुभ संकेत आहेत. शिवाय पक्षांचा आवाज देखील शुभ संकेत आहेत.घरात लहान बाळ असणं जर घरातील लहान बाळाला पाहून तुम्हाला आनंद होत असेल, तसेच ते बाळ तुम्हाला काही सकारात्मक गोष्टी सांगत असेल तर ते चांगले संकेत आहेत.

स्वप्नात मंत्रांचा उच्चार ऐकू येणं जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील. तसेच गायत्री मंत्र, घंटा, शंख यांचा आवाज ऐकू येणं याचा अर्थ काहीतरी चांगलं घडणार आहे.

शरीरातील एकाद्या अवयवाचं फडफडणं पुरुषांमध्ये डावा डोळा फडकणं शुभ मानलं जातं. तर याच्या विरुद्ध महिलांचा उजवा डोळा फडकणं शुभ मानलं जातं. हे देखील आयुष्यात काहीतरी चांगलं होण्याचे संकेत आहेत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!