नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना देखील म्हटलं जातं.
अधिक मासामुळे, 2023 मध्ये सणांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. परंतु सर्व प्रथम अधिक मासाची गणना कशी केली जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. पंचांगाच्या आधारावर, प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अधिक असतो, ज्याला अधिक मास म्हणतात.
एक सौर वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचे असते आणि चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते. सौर वर्ष आणि चंद्र वर्षातील फरक समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक चंद्र महिना जोडला जातो. याला मलमास म्हणतात. हिंदू धर्मात मलमास दरम्यान शुभ कार्ये निषिद्ध आहेत. 2023 मध्ये मालमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहे.
2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.
सहसा श्रावण महिन्यात 4 किंवा 5 सोमवार येतात. पण 2023 मध्ये 8 श्रावण सोमवार केले जाईल. कारण पंचांगानुसार, सावन कृष्णपक्ष 4 ते 17 जुलैपर्यंत आहे आणि त्यानंतर 18 जुलैपासून लागू होईल.
तर, 16 ऑगस्ट रोजी मलमास अमावस्या असेल. या दिवशी अधिक मास समाप्त होईल. यानंतर, श्रावणचा शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 30 ऑगस्ट रोजी, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होईल.
अशाप्रकारे श्रावण महिन्यातील अतिरिक्त मासामुळे 8 सोमवार येणार आहेतजेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो.
म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो.”अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात.धोंड्याचा महिना आणि जावयाचा संबंध अधिक महिन्यात दानधर्म करावा, असं शास्त्रात सांगतात.
पण यथाशक्ती दान असावं आणि ते गुप्त असावं याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. “हिंदू संस्कृतीत गुप्त दानाला महत्त्व आहे. प्रतिष्ठेसाठी परंपरेच्या नावावर केलेलं दान शास्त्रात उल्लेखलेलं नाही. अनारशाचं वाण आणि दीपदान एवढंच अपेक्षित असतं.
जावयाला विष्णूचं स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे.”अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे अनेक घरांमध्ये करतात. महागड्या वस्तू, सोनं-नाणं जावई किंवा सासरच्या मंडळींना देण्याच्या प्रथेचे प्रस्थ अलिकडे वाढले आहे आणि ते अनिष्ट आहे,
त्याऐवजी “आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान , अर्थदान, ग्रंथदान गरजू लोकांना करणे जास्त योग्य आहे,” या महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत आहे.
अधिकामांचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात.
महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो.
या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा अर्चा करुन पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं.चैत्रापासून फाल्गुनापर्यंत म्हणजे 12 महिन्यात 355 दिवस असतात,
तर नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस हे 365 दिवस असतात. याचा अर्थ 10 दिवस तीन वर्षांनी 30 झाल्यावर अधिकचा महिना येतो. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो.
म्हणून या महिन्यात 33 या आकड्याला तेवढंच महत्त्व आहे. म्हणून या महिन्यात 33 वस्तूचं दान, वाण, जणांना अन्नदान, जोडप्यांसह सामुहिक पूजा केली जाते.
तर हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रुप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो.
त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रुप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तूपातील 33 अनारसे दिले जातात.
एका चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिलं जातं. यालाच जावयाचं वाण असं म्हणतात. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या.
देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात.
तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात.
म्हणूनतुम्हा जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देऊन. 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.