नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, माझ्या प्रत्येक गृहिणीला कामाला येतील अशा 15 किचन टिप्स…
पावसाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटते तसेच साखरेला मुंग्या लागू नयेत यासाठी लिंबू पिळून शिल्लक राहिलेली साल फेकून न देता वाळवून साखरेच्या डब्यात ठेवून द्या यामुळे साखरेला पाणी सुटत नाही आणि मुंग्या पण लागत नाहीत.
अंडी उकडताना नेहमी कमी गॅसवर उकळावेत तसेच अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ टाकावे यामुळे अंडी एकसारखी उकडली जातात आणि फुटत देखील नाहीत.
अंडी उकडल्यानंतर थोडा वेळ थंड पाण्यात ठेवावेत यामुळे अंड्याचे टरफल पटकन निघतात.
वर्षभर लागणाऱ्या साठवणीच्या डाळी स्वच्छ रहाव्यात आणि त्यांना कीड लागू नये यासाठी डाळीमध्ये दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र टाकावे यामुळे डाळिंब कीड लागत नाही.
शिरा बनवताना नेहमी तूप हे रव्याच्या निम्मे घ्यावे आणि शरीराला नेहमी कडकडीत गरम पाणी टाकावे यामुळे शिरा मऊ लुसलुशीत आणि चवीलाही खूप छान बनतो.
सकाळी बनवलेल्या पोळ्या चपाती जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहण्यासाठी पोळीच्या डब्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा ठेवा यामुळे पोळ्या चपाती जास्त वेळ मऊ राहतात.
दूध गरम करताना दूध हे नेहमी कमी गॅसवरच गरम करावे यामुळे दूध चांगले गरम होते आणि दुधाला जाडसर अशी साई देखील येते.
कणिक मळताना त्यात किंचित साखर टाकावी यामुळे चपाती मऊ बनते आणि चवीलाही छान लागते.
कोणत्याही ग्रेव्हीमध्ये चुकून मीठ जास्त झाले तर अशा वेळेला ग्रेव्हीमध्ये दोन ते तीन चमचे दही टाकावे यामुळे ग्रेव्ही जास्त खारट लागत नाही.
वेजिटेबल सूप बनवताना भाज्यांना नेहमी तुपाची फोडणी द्यावी यामुळे सूप चवीला भन्नाट लागते.
दूध उतू जाऊ नये यासाठी दुधाच्या पातेल्याच्या काठाला तुपाचा हात फिरवा यामुळे दूध उतू जात नाही.
शिरा बनवताना नेहमी एक कप रव्यासाठी अर्धा कप तूप आणि अडीच कप पाणी असे प्रमाण वापरा शिरा हलवा एकदम छान बनेल.
दाळ आमटी वरण यांना तुपाची फोडणी दिली तर चव हॉटेल सारखी येते.
डोसा बनवताना डोस्याच्या पिठात दोन ते तीन चमचे रवा टाका यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात.
पोहे बनवताना कांदा जास्त वापरा कांद्यामध्ये जास्त मॉइश्चर असल्यामुळे पोहे छान मऊ लुसलुशीत बनतात आणि चव सुद्धा छान येते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.