या १५ किचन टिप्स तुमच्या जेवणाची चव दुप्पट वाढवतील, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, या 15 किचन टिप्स तुमच्या जेवणाची चव दुप्पट वाढवतील. 

शिरा बनवताना नारळाचा चव हा रवा निम्मा भाजल्यानंतर रव्यात टाकावा आणि नेहमीप्रमाणे शिरा बनवावा यामुळे शिरा जास्त चवदार बनतो. 

पुरण शिजवताना डाळीसोबत चिमूटभर तांदूळ टाकावे यामुळे पुरण पातळ होत नाही तर छान घट्ट होते. 

गुळाची खव्याची किंवा तिळाची पोळी बनवताना कणकेमध्ये किंचित सोळा टाका यामुळे पोळ्या छान हलक्या फुलक्या बनतात.

तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये किंचित मीठ घालावे यामुळे केलेला खूप छान चव येते. 

जेव्हा आपण बासुंदीसाठी दूध आठवतो तेव्हा दुधाच्या पातेल्यामध्ये तळाशी एक छोटी वाटी ठेवावी यामुळे दूध तळाशी चिकटत नाही. 

चिकन शिजवताना नेहमी कढईमध्ये आणि अगदी कमी गॅसवर शिजवावे यामुळे चिकन छान शिजले जाते आणि चवीला सुद्धा छान लागते. 

शाही करी बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये काजू खसखस पेस्ट आणि नारळाचे दूध घालावे यामुळे शाही ग्रेवीला स्ट्रक्चर खूप छान येते तसेच चव सुद्धा भन्नाट लागते. 

किचन मधील लाकडी चोपिंग बोर्ड आणि काही इतर लाकडी वस्तू असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी विनेगर चा वापर करावा यामुळे किचन मधील लाकडी वस्तू छान स्वच्छ निघतील. 

डाळ शिजवताना डाळीचे प्रमाण चुकून जास्त झाले तर शिल्लक राहिलेली डाळ पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाकावी यामुळे डाळ ही वाया जाणार नाही आणि पराठे सुद्धा पौष्टिक बनतील. 

तुरीची डाळ शिजवण्या अगोदर वीस मिनिटे भिजत ठेवली तर यामुळे डाळीला चव खूप छान येते. 

ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थोडी तिळाची पेस्ट टाकली तर यामुळे भाजी छान घट्ट होते. 

उकडीचे मोदक बनवताना पाण्यात थोडे मीठ आणि साखर घालावी यामुळे मोदकाला छान चकाकी येते. 

जर इडली डोसा चे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडे नारळाचे दूध घालावे यामुळे पिठाचा आंबटपणा निघून जातो. 

तोप कळवल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी वेलची कुठून टाका यामुळे तुपाला खूप छान वास येईल. 

चहा बनवताना अद्रक हे शेवटी किसून घाला यामुळे चहाला अद्रक चा छान वास लागतो. 

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!